पदप्राधान्य - या २८ प्रकारच्या पदांचे प्राधान्य उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या अर्जात द्यावे लागते. तुमची अंतिम निवड तुम्ही दिलेले प्राधान्य आणि तुमची गुणवत्ता याआधारे केली जाते.
पदांची संख्या - अलिकडे सर्वच पदांची संख्या बरीच कमी झाली असून यासाठी लागणा-या एकूण उमेदवारांची अंतिम संख्या
आता साधारणपणे ४०० ते ५०० इतकी राहिली आहे.
जाहिरात कधी येते - सर्वोच्च स्पर्धा परीक्षेची जाहिरात प्रतिवर्षी साधारणपणे डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात येते. एम्प्लॉयमेंट न्यूज बरोबरच मराठीतून प्रसिध्द होणा-या वर्तमान पत्रात ही जाहिरात सविस्तर येते.
शैक्षणिक पात्रता - यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा तो पदवीच्या अंतिम परीक्षेस बसलेला असला तरी चालतो. यासाठी कोणत्याही टक्केवारीची अट नसते.
वय - सर्वसाधारण उमेदवाराचे वय जाहिरात मध्ये येते त्यावर्षीच्या १ ऑगस्ट रोजी कमीत कमी २१ आणि जास्तीत जास्त ३० लागते. अनु जाती व अनु. जमातींना वयात ५ वर्षे तर इतर मागासवर्गीयांना वयात ३ वर्षे सवलत असते.
किती वेळा बसता येते - वय संपेपर्यंत सर्वसाधारण उमेदवारांना चार वेळा, ओबीसी उमेदवारांना सात वेळा, तर अनु. जाती/जमातीच्या उमेदवारांना वयाची अट संपेपर्यंत कितीही वेळा बसता येते.
अर्ज कसा करावा - या परीक्षद्वारे २८ प्रकारची विविध पदे भरली जात असली तरी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा
लागत नाही. सर्व २८ प्रकारच्या पदांसाठी एकच अर्ज करावा लागतो. यासाठी उमेदवारांना फक्त विहित नमुन्यातच अर्ज करावा लागतो
विहित नमुन्यातील हे अर्ज फक्त जिल्हयाच्या हेड पोस्ट ऑफिसमध्ये माहिती पुस्तिकेसह २० रू. किंमतीला मिळतात. पोस्टातच अर्जासोबत अॅकॉनॉलेजमेंट कार्डही मिळते. ते कार्ड भरून त्यावर उमेदवारास पोस्टाचे योग्य ते तिकीट लावावे लागते. अर्जासोबतच्या माहिती पुस्तकांमध्ये विशेष लिफाफा पुरविला आहे त्यामध्ये अर्ज घालून पाठवावा लागतो