सामान्य अध्ययन पेपर (दोन)-कॉम्प्रिहेन्शन, इंटरपर्सनल स्कील, कम्युनिकेशन स्कील, लॉजिकल रिझनिंग अॅण्ड अॅनालिटिकल अॅबिलिटी, डिसीजन मेकिंग,अॅण्ड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, जनरल मेंटल अॅबिलिटी, बेसिक न्युमरसी, इंग्लीश लँग्वेज कॉम्प्रिहेन्सिव्ह आदी अभ्यासक्रमांवर ८० प्रश्न विचारले जातात. याही पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग केलं जातं. पूर्वपरीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या तिस-या आठवड्यात जाहीर होतो.
मुख्य परीक्षा-पूर्वपरीक्षेला बसलेल्या एवूâण उमेदवारांपैकी फक्त १००० जागा भरायच्या असल्यास एका जागेसाठी १३ उमेदवार याप्रमाणे १००० गुणे १३ १३००० इतके उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवले जातात. मुख्य परीक्षा ऑक्टोबर २५ ते नोव्हेंबर १० या कालावधीत घेण्यात येते. मुख्य परीक्षा ही पूर्णतः वर्णनात्मक (descriptive) पद्धतीची असते. मुख्य परीक्षेत एकूण नऊ पेपर सोडवावे लागतात. ही परीक्षा २६०० मार्काची असते. या सर्व पेपरांना प्रत्येकी तीन तास वेळ दिला जातो. हे नऊ पेपर पुढीलप्रमाणेसक्तीची
एक भारतीय भाषा (३०० गुण)
सक्तीची इंग्रजी भाषा (३०० गुण)
(वरील दोन्ही पेपरचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत धरले जात नाहीत. या पेपरमध्ये कमीत कमी ४० टक्के गुण मिळवले तरी चालतात)
सक्तीचा निबंधाचा पेपर (२०० गुण)
जनरल स्टडीज पेपर एक (३०० गुण)
जनरल स्टडीज पेपर दोन (३०० गुण)
ऐच्छिक विषय पेपर एक (३०० गुण)
ऐच्छिक विषय पेपर दोन (३०० गुण)
ऐच्छिक विषय पेपर एक (३०० गुण)
ऐच्छिक विषय पेपर दोन (३०० गुण)
एकूण गुण २६०० गुण
भारतीय भाषेचा सक्तीचा पेपर आणि इंग्रजीचा सक्तीचा पेपर यांचे ६०० गुण अंतिम गुणवत्ता यादीत धरले जात नाहीत. त्यामुळे पेपर तीन ते पेपर नऊ चे एकूण २००० गुण व मुलाखतीचे ३०० गुण म्हणजेच २३०० पैकी अधिकाधिक गुण मिळवणा-याची पदसंख्येनुसार अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते.
मुलाखत-मुख्य परीक्षेतून १ः३ या प्रमाणानुसार पदांची संख्या १००० असेल तर गुणे ३ ३००० उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात येतं. या ३००० उमेदवारांतून अंतिम १००० उमेदवारांची निवड करण्यात येते. या १००० उमेदवारांची रँक त्यांना २३०० मार्कापैकी किती गुण मिळाले यावर अवलंबून असते. गुणवत्ता यादीतील उमेदवारांचे स्थान आणि त्यांची निवड यानुसार आयएएस, आयपीएस, आयपीएफएस, कस्टम, रेव्हेन्यू यासारख्या केंद्र शासनातील, विविध विभागांतील सुपर क्लास वन पदाकरता उमेदवारांची निवड करण्यात येते. (ग्रुप ए व गु्रप बी ) महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर या ठिकाणी पूर्वपरीक्षा तर मुंबईत मुख्य परीक्षा घेण्यात येते. मुलाखत लोकसेवा आयोगाच्या धोलपूर हाऊस, नवी दिल्ली कार्यालयात घेण्यात येते.
संपूर्ण परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की, ही परीक्षा अवघड असली तरी अशक्य नक्कीच नाही. या परीक्षेचा पसारा खूप मोठा आहे. पण तिचं योग्य नियोजन केलं तर त्यात यश मिळवणं अशक्य नाही. या परीक्षेत यशस्वी व्हायचं असेल तर योग्य मेहनत, जिद्द, चिकाटी या तीन गोष्टी तुमच्या अंगी असणं आवश्यक आहे. वर्तमानपत्राचं वाचन, नामवंत लेखकांची, अभ्यासकांची पुस्तवंâनियमित वाचली तर परीक्षा तुम्हाला १०० टक्के यश देते. या परीक्षेचा महत्त्वाचा कानमंत्र म्हणजे योग्य विषयांची निवड, योग्य पुस्तकांचा संग्रह, नामवंताच्या उच्च दर्जाच्या नोट्स आणि योग्य मार्गदर्शन या सगळया गोष्टी मिळाल्या तर तुमचं लक्ष्य दूर नाही.