भारत देशाचा प्रचंड भौगोलिक आकार व सामान्य जनतेची विविधता, राजकीय, भाषिक, जातीय, प्रादेशिक असे विविध प्रकारचे प्रश्न विचारात घेऊन लिहिलेले संविधान प्रदीर्घ झाले आहे. भारतीय राज्यघटना अंशतN लवचिक व अंशत: ताठर स्वरूपाची आहे. पण ब्रिटिश राज्यघटनेपेक्षा ती कमी लवचिक तर अमेरिकेच्या घटनेच्या दृष्टीने कमी ताठर आहे, हेही खरंच. मग भारत `मृदू राष्ट्र` आहे किंवा नाही याबद्दल सखोल विवेचन विद्यार्थी करू शकतो. भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्टयाचा अभ्यास व्हायला हवा. भारतातील न्यायव्यवस्था ही जगातील आदर्श न्यायव्यवस्था मानली जाते. पण अलीकडील प्रलंबित खटल्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आणि निर्णय देताना न्यायाधीश महोदयांच्या निर्णयाचा अर्थ वेगळा लागू शकतो. म्हणून तर त्रिस्तरीय अशी रचना केली आहे. उच्च न्यायालय, दुय्यम न्यायालय, प्रशासकीय न्यायालय, कुटुंब न्यायालय, इतर न्यायालये आणि कायदा आयोगाबाबतही माहिती प्राप्त करून घ्यावी. एमपीएससीची पूर्वपरीक्षा हा स्पर्धा परीक्षेतील पहिला व महत्त्वाचा टप्पा आहे. महाराष्ट लोकसेवा आयोगाने पूर्वपरीक्षेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
नवीन अभ्यासक्रमानुसार झालेली परीक्षा अत्यंत सकारात्मक व आव्हानात्मक होती. या नव्या आव्हानाला यशस्वरीत्या तोंड देण्यासाठी नवीन अभ्यासक्रम लक्षात घेणं गरजेचं आहे.
राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात महाराष्ट्र आणि भारत, राज्यव्यवस्था आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, नागरी शासनव्यवस्था, सार्वजनिक धोरण हक्क संदर्भातील मुद्दे इ. घटक आहेत. पूर्वपरीक्षेत यश मिळवण्यासाठी घटकनिहाय अभ्यास व भरपूर सराव केला पाहिजे. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी आवश्यक गुण मिळवण्याची क्षमता निर्माण करणं सरावानेच शक्य आहे.
अभ्यासक्रमाप्रमाणेच दर्जेदार संदर्भ साहित्याची उपलब्धता व योग्य मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं ठरतं. संदर्भग्रंथासहित शालेय पाठयपुस्तकं यासंदर्भात मूलभूत ठरतात.