1. पंजाब-हरियाणात विस्तीर्ण गाळाची मैदाने आहेत.
2. भाक्रा-नांगल प्रकल्पाद्वारे काढलेल्या कालव्यांमधून जलसिंचन केले जाते.
3. उपक्रमशील शेतकरी आणि कृषी संशोधन यामुळे शेतीचा विकास झाला आहे.
4. हरित क्रांतीच्या यशानंतर दर हेक्टरी उत्पादन वाढले आहे.
5. लागवडीखालील क्षेत्रापैकी 38 टक्के क्षेत्र गव्हाच्या लागवडीखाली, 14 टक्के क्षेत्र तांदळाच्या लागवडीखाली, सहा टक्के क्षेत्र कडधान्याच्या लागवडीखाली आणि पाच टक्के क्षेत्र बाजरीच्या लागवडीखाली आहे.
`टीपा लिहा,' या प्रश्नाचे उत्तर लिहिताना चार मुद्दे लिहावेत. आशय पाठ्यपुस्तकातील मुद्द्यांशी सुसंगत पाहिजे. स्टेन्सिल्सचा वापर करून पूर्ण नकाशा काढावा. त्यामध्ये उत्पादक क्षेत्रे, एखादे प्रमुख क्षेत्र दाखवावे.
उदाहरणार्थ, दख्खनच्या पठारावरील पर्यटन यावर टीप लिहा, या प्रश्नाचे उत्तर लिहून झाल्यावर भारताचा नकाशा काढून त्यामध्ये महाबळेश्वर, उदगमंडलम, बेंगळुरू, हैदराबाद यापैकी एखादे ठिकाण दर्शवावे.
प्र. 3 (अ) रेषालेख, साधा स्तंभालेख, विभाजित आयत, विभाजित वर्तुळ यापैकी एक आलेख दोन गुणांकरिता काढायला येईल. आलेख काढताना आलेखाचे शीर्षक, प्रमाण आलेख कागदावर स्पष्टपणे लिहावे. प्रमाण न लिहिल्यास एक गुण कमी केला जातो. विभाजित आयत व विभाजित वर्तुळ काढताना योग्य सूची दर्शवणे आवश्यक आहे.
प्र. 3 (ब) करिता एखादा नकाशा, आकृती, आलेख यावर आधारित चार प्रश्न विचारले जातात. त्यापैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. ही उत्तरे लिहिताना पूर्ण वाक्यात उत्तर लिहावे. केवळ एक शब्द लिहून उत्तर पूर्ण होत नाही.
प्र. 3 (क) भारताच्या नकाशात माहिती दर्शवणेकरिता योग्य सूची काढणे आवश्यक आहे. बिंदू पद्धतीने एखादे ठिकाण दर्शविण्यासाठी अचूक स्थान दाखवणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ, के २ भारतातील सर्वांत उंच शिखर आहे, हे दाखवताना एक छोटा बिंदू किंवा त्रिकोण काढून स्थान दर्शवायचे आहे. सूचीमध्ये तसे लिहायचे आहे. या शिखराची उंची 8611 मीटर आहे. कंसात त्याची उंची लिहिल्यास उत्तर अधिक अचूक होईल. एखादी नदी दर्शविताना तिचे उगमाचे स्थान माहीत असल्यास लिहावे. पूर्ण नदी दाखवणे आवश्यक आहे. दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे लिहिताना अशा प्रश्नांची निवड करा, की ज्यामध्ये तुम्हाला नकाशा, आकृती, आलेख काढायला वाव मिळेल. भारताच्या नकाशात एखादे ठिकाण दाखवा आणि माहिती लिहा, असा प्रश्न विचारल्यास एक गुण नकाशाला दिला जातो आणि तीन गुण लेखी कामाला दिले जातात. चार गुणांच्या उत्तराची सुरुवात प्रस्तावनेने करा. प्रस्तावनेत तीन ते चार मुद्दे लिहा. मुख्य उत्तर 7 ते 8 मुद्द्यांचे लिहा. एक पान लिखाण आणि दुसर्या पानावर नकाशा, आलेख, आकृती यापैकी एक काढा. उत्तर अधिक परिणामकारक होईल. आकृत्या काढताना पाठ्यपुस्तकातील आकृत्यांव्यतिरिक्त आकृत्या काढल्यात तरीही चालेल.
अर्थशास्त्राच्या दोन गुणांच्या प्रश्नांकरिता 3 ते 4 मुद्दे लिहावेत.
ज्या ठिकाणी शक्य आहे, तेथे दैनंदिन जीवनातील उदाहरणे द्यावीत. उदाहरणार्थ, भाववाढ, ग्राहक संरक्षण, भेसळ यांच्याशी संबंधित उदाहरणे लिहिल्याने उत्तराची परिणामकारकता वाढते. दीर्घोत्तरी एक प्रश्न चार गुणांकरिता आहे. त्याचे उत्तर लिहिताना प्रस्तावनेत 3 ते 4 मुद्दे लिहा. उदाहरणार्थ, ग्राहकाचे अधिकार स्पष्ट करताना प्रस्तावनेत ग्राहक संरक्षण कायद्याबद्दल थोडक्यात माहिती लिहावी. या कायद्याची उद्दिष्टे लिहावीत आणि मुख्य उत्तराचे सर्व मुद्दे लिहावेत. )
महत्त्वाच्या सूचना - पाठ्यपुस्तकाचे सातत्याने वाचन करा., नकाशात अचूक माहिती दर्शवा. मुद्देसूद लिखाण करा. वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या उत्तरात कोणतीही खाडाखोड करू नका. `स्टेन्सिल्स'चा वापर करा.
दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे लिहिताना महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करा. तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा