वस्तुतः केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही सुरुवातीपासूनच विद्याथ्र्यांचा कस पाहाणारी सर्वसमावेशक आणि आव्हानात्मक परीक्षा मानली जाते. या सेवेचा जगातील फ्रेंच नागरी सेवा परीक्षेपाठोपाठ कठीण परीक्षा म्हणून लौकिक आहे. केंद्र लोक आयोगाने या परीक्षांचे निःष्पक्ष, पारदर्शी आणि कार्यक्षमपणे आयोजन करून स्वच्छ कारभाराचा पायंडा रूढ केला आहे.
मुलाखत हा केंद्र लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतील शेवटचा आणि महत्त्वपूर्ण टप्पा असतो. उमेदवाराचे अंतिम यादीतील स्थान निश्चित करण्यात हा टप्पा निर्णायक ठरू शकतो. म्हणूनच यात जास्तीत जास्त गुण मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवणे अत्यावश्यक आहे. यूपीएससीने २७५ गुणांसाठी तर एमपीएससीने १०० गुणांसाठी मुलाखतीचा अंतिम टप्पा निर्धारित केलेला आहे. लोकसेवा आयोगाने मुलाखतीस व्यक्तिमत्त्व चाचणी असे संबोधले आहे. मुलाखतीचा हेतू उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व सनदी सेवा पदासाठी सक्षम आहे किंवा नाही याची तपासणी करणे होय.
जगाच्या पाठीवर कुठेही गेलोतरी बँक हि सापडणारच. आर्थिक क्षेत्रात बँकिंगचा महत्त्वाचा वाटा आहे. बदलत्या, खुल्या अर्थ-व्यवस्थेत, जागतिकीकरणाच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत बँकांचा तितकाच मौल्यवान सहभाग आहे. व्यापाराची..व्यवसायाची बदलती रूपं, देशा-देशांच्या सीमा पुसून आयात-निर्यातीला आलेला वेग, डॉलरपाठोपाठ युरोचे वाढते साम्राज्य, संगणक-इंटरनेटच्या माध्यमातून शीघ्र पेमेंट सिस्टिम, ई कॉमर्सच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलेलं ई-बँकिंग अशा सगळ्या घडामोडीत बँकिंग हे क्षेत्र व्यापक होते आहे
आज विद्याथ्र्यांना अद्ययावत विज्ञानतंत्र्, तंत्रज्ञान, शिक्षण-करिअरमधील प्रचंड स्पर्धा यासारख्या वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. ते पेलताना विद्याथ्र्यांच्या बुद्धिमत्ता आणि कौशल्याची कसोटी लागते. मुलाचा शिक्षणक्रम निवडण्याच्या वेळेस मुलाची भावनिक, सामाजिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासाची पातळी पालकांना समजणे अधिकाधिक अवघड होत आहे
ज्यांना परीक्षेची खरोखर भीती वाटत नाही, अशा विद्याथ्र्यांमध्ये काही गुण प्रकर्षाने दिसतात. ते म्हणजे वेळेचे व्यवस्थापन, अभ्यासाचे नियोजन व सकारात्मक दृष्टिकोन या बाबी सर्वात महत्त्वाच्या असतात. या तिन्ही बाबी जन्मजात नसतात; परंतु प्रयत्न केल्यास त्या सहज आत्मसात करता येतात. त्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांच्या प्रयत्नांची गरज असते. कॉम्प्युटरमधील सर्व विद्यार्थ्याचा डाटा करप्ट झाल्याने पुढे ढकलण्यात आलेली एमपीएससीची परीक्षा पुन्हा एकदा घोळात सापडली आहे. १८ मे ला होणा-या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यानी मागणी केलेली परीक्षा केंद्रे न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य लोकसेवा आयोगामार्फत ७ एप्रिललाया परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु अचानक लोकसेवा आयोगाकडून परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्याचा डाटाच नाहीसा झाल्याने ही परीक्षा १८ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे निर्धास्त झालेले विद्यार्थी हॉल तिकिट हातात पडल्यानंतर मात्र पुन्हा गोंधळात पडले आहेत. नाशिकच्या अनेक विद्यार्थ्याना पुणे, मुंबई, अहमदनगर यासह राज्यातील अन्य शहरांमधील काही परीक्षा केंद्रे देण्यात आलेली आहेत. अर्ज भरताना नाशिक केंद्राची मागणी करुनही आयोगामार्फत ही चूक झाल्याचे संबंधित विद्यार्थ्यानी सांगितले. परीक्षेला केवळ दहा दिवस उरलेले असतानाच अचानकपणे केंद्र बदलल्याचे कळल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. याबाबत आयोगाशी संपर्क साधला असता हॉल तिकिटवर मिळालेल्या केंद्रावरच विद्यार्थ्यानी परीक्षा द्यावी लागेल असे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यानी केन्द्र बदलून देण्याची मागणी केली असता आयोगाने नकार दिला आहे . यापूर्वी आयोजित केलेल्या परीक्षेचा डाटा नाहीसा झाल्यामुळे संबंधित परीक्षा जवळपास दीड महिना पुढे ढकलण्यात आली होती. या कालावधीत विद्यार्थ्यानी पुन्हा हे अर्ज भरुन सर्व प्रक्रिया पार पाडली. तरीही आयोगामार्फत परीक्षा केंद्राच्याबाबतीत ढिसाळपणे नियोजन केल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक प्रशासनाचा तसंच नागरी सोयीसुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करते. प्रशिक्षित कर्मचारी आणि अधिकारी तसंच लोकप्रतिनिधी घडवण्यासाठी संस्थेने शैक्षणिक आणि प्रशिक्षण कार्य हाती घेतलं आहे. नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा वगैरे स्थानिक शासन संस्थांमधील कर्मचारी आणि या क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-या व्यक्तींसाठी संस्थेने अनेक व्यावसायाभिमुख कोर्सेस तयार केले आहेत. या कोसेर्सना युनिव्हसिर्टीची मान्यता आहे.
कोणत्याही अपयशाचे खापर फोडण्यासाठी.. एखादा दहशतवादी हल्ला झाला, अतिरेकी स्फोट घडविण्यात यशस्वी झाले, खोटे चलन बाजारपेठेत अवतरले, अमली पदार्थाची रेव्ह पार्टी यशस्वीपणे पार पडली किंवा अगदी एखाद्या प्रकरणाच्या तपासात अपयश आले की आपण भारतीय आपल्याच गुप्तचर खात्याला दोष देऊन मोकळे होतो. कारण गुप्तचर खात्याचे नेमके काम-जबाबदा-या काय आहेत, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसते; शिवाय त्याविषयी काही जाणून घ्यायचे कुतूहलही आपण फारसे दाखवत नाही.
खासगी क्षेत्रातल्या नोक-या कितीही वाढल्या असल्या आणि त्यातील भल्यामोठ्या पगाराचे आकडे चमकत असले तरी बँकेतल्या नोक-यांचं महत्त्व कमी झालेलं नाही. आजही बँकेच्या नोकरीविषयी आपल्या मध्ये आकर्षण कायम आहे. अभ्यास करा असा धोषा सगळेच जणं लावतात. परंतु, दहावी, बारावी आणि ग्रॅज्युएशन करताना त्या-त्या पातळीवर नेमक काय करायचं, याच्या थेट ११ टिप्स तुम्हांला देत आहेत.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|