सर्वसाधारणपणे प्रशासकीय सेवेतील मुलाखती अधिक औपचारिक असतात. यामध्ये प्रोटोकॉल ची जाण, वरिष्ठ पदांचे भान या बाबी अपेक्षित असतात. पीएसआय चे पद हे एकात्मिक सेवा आणि कायदासुव्यवस्थेशी थेट निगडित असल्याने उमेदवारांकडून शिस्तीची अपेक्षा अधिक असते. त्यामुळे उमेदवारांचे सादरीकरण व देहबोली सकारात्मक असायला हवी.
चांगल्या कंपनीत चांगली नोकरी मिळविण्यासाठीसुद्धा वयोमर्यादा निश्चित केलेली असते. वय झाल्यावर कोणीही नोकरी देत नाही. वय संपल्यावर कोणीही विचारत नाही. त्यामुळे योग्य वयात शिक्षण पूर्ण करणे, करिअर करणे किंवा विविध प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षा देणे, स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करणे, भरपूर अभ्यास व मेहनत करणे अत्यंत आवश्यक आहे. एकंदरीत करिअरचे नियोजन `टाइम मॅनेजमेंट`चा आधार घेऊन करणं, काळाची गरज आहे.
सिंधू संस्कृतीमध्ये त्या संस्कृतीची वैशिष्टये, महत्त्वाची शहरे, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, समाज, धार्मिक धारणा, लिपी, मृतदेह पुरण्याच्या पद्धती, महत्त्वाचे अवशेष व त्यांचा अर्थ आणि या संस्कृतीचा र्हास यांचा अंतर्भाव होतो. सिंधू संस्कृती व आर्याचे आगमन यांबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. सिंधू संस्कृतीचे लोक व आर्य यांच्यामध्ये कोणता असा संबंध होता की सिंधू संस्कृतीच्या संपूर्ण र्हासानंतर आर्य आले हा मतभेदाचा मुख्य मुद्दा ठरतो.
स्पर्धा परीक्षांची सवय नसल्यामुळे गेल्या वर्षीची परीक्षा अवघड गेल्याचा अनेकांचा अनुभव असेल. त्यासाठी बहुपर्यायी प्रश्न सोडवण्याची सवय हवी. अनेक वेळा उत्तर माहीत असते पण ते नेमक्या वेळी आठवत नाही, असाही अनेकांचा अनुभव असेल. प्रश्न पाहणे, पर्याय पाहणे आणि त्यातून नेमके उत्तर सुचणे ही मेंदूची प्रतिक्षिप्त क्रिया असली पाहिजे. त्यासाठी वेळेचे नियोजन करून प्रश्न सोडवण्याचा सराव आवश्यक आहे.
5 नोव्हेंबर 2014 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विक्रीकर विभागातील विक्रीकर निरीक्षक `गट ब' या संवर्गातील एकूण 445 पदांच्या भरतीकरता अधिसूचना जारी केली. ही परीक्षा 1 फेब्रुवारी 2015 रोजी राज्याच्या 36 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमात सामान्य अध्ययन या घटकाअंतर्गत `भारतीय अर्थव्यवस्था' हा महत्त्वाचा घटक समाविष्ट करण्यात आला आहे.
यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्राचा अभ्यास करताना सुरुवातीला मुख्य आर्थिक संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. अलीकडच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर लक्षात येते की, अर्थशास्त्रावर बेतलेले प्रश्न हे संकल्पनांवर आधारित असतात. काही आकडेवारी लक्षात ठेवावी लागते अथवा ती पाठ केल्याशिवाय पर्याय नसतो, उदा. जनगणनेसंबंधित आकडेवारी, आयातनिर्यातसंबंधित आकडेवारी. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. खूप काळ एकांतवासात राहायला लागले, तर आपला मानसिक तोल ढासळू लागतो, हे अनेक शोधांद्वारे सिद्ध झालेले आहे. असे असतानाही अनेकांना इतरांशी संवाद साधणे कठीण जाते.
शिक्षण पद्धतींमध्ये झालेल्या बदलांप्रमाणे डिस्टन्सएज्युकेशन म्हणजेच दूरस्थ शिक्षण हा एक नवीन मार्ग म्हणता येईल. शिक्षण घेऊ इच्छिणाNयांसाठी एक नवीन पर्याय आहे असेही म्हणता येईल. या डिस्टन्स एज्युकेशनमुळे जॉब करून शिकू पाहणा-या किंवा एका शाखेतून दुस-या शाखेत शिकू इच्छिणा-यांसाठी ज्ञानाचे एक नवीन कवाड खुले झाले आहे किंवा शिक्षण अर्धवट झालेल्यांसाठी देखील हि सुवर्णसंधी आहे.
शासकीय नोकरीत आपले करिअर करू इच्छिणा-या युवावर्गासाठी बँक क्षेत्र हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. यंदाचा बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी प्रवर्गातील भरती प्रक्रियेचा कल लक्षात घेतल्यास- आय.बी.पी.एस., स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत 2014-15 वर्षांत सुमारे 90 हजार अधिकारी व कर्मचारी पदे भरण्यात येणार असल्याचे स्पष्ट होते. या पर्वणीचा लाभ बारावी व पदवीधर विद्याथ्र्यांनी करून घ्यायला हवा. विविध इन्स्टिटयूटद्वारे घेतल्या जाणाया बँकिंग, क्लार्क, पी.ओ., स्केल-वन, स्केल-टू व स्केल-थ्री, ग्रुप- ए अधिकारीवर्गाच्या परीक्षा तसेच ग्रुप- बीच्या
परीक्षा, लिपिक पदाच्या परीक्षा, ग्रामीण क्षेत्रीय बँकांसाठी लागणार्या विविध पदांसाठी घेतल्या जाणार्या परीक्षांची माहिती देत आहोत - सध्याच्या जागतिकीकरणाच्या दिवसांत व्यापार मोठया प्रमाणात वाढीस लागला आहे. जगभरातील मोठमोठया कंपन्या भारतात येत आहेत, तर भारतातील कंपन्या आपला विस्तार देशात आणि देशाबाहेर करीत आहेत. या अवाढव्य कंपन्यांचा डोलारा सांभाळायला कुशल व्यावसायिक आणि तज्ज्ञांची गरज असते. सर्वसाधारणपणे कंपनी म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर केवळ मॅनेजमेंट उभी राहते. यात व्यवस्थापनाची पदवी घेतलेल्या व्यक्तींचा समावेश असतो. पण कंपनीची कायदेशीर बाजू सांभाळण्याचे आव्हानात्मक काम `कंपनी सेक्रेटरी' ही व्यक्ती करीत असते.
मुख्य परीक्षेत निबंध अनिवार्य असतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तो विषयाला अनुसरून, मुद्देसूद, विविध चर्चाचा ऊहापोह केलेला असावा. मुख्य म्हणजे त्यात स्वत:ला अधोरेखित करावं. वर्तमानाचं भान ठेवून सुवाच्च अक्षरात निबंध लिहिला तर नक्कीच चांगले गुण मिळतील. मात्र त्यासाठी कसा सराव करणं आवश्यक आहे, याबाबतची थोडक्यात माहिती राज्यसेवा मुख्य परीक्षेत 800 गुणांपैकी 200 गुण - वर्णनात्मक मराठी आणि 100 गुण इंग्रजी असं स्वरूप आहे. या वर्णनात्मक स्वरूपाच्या उत्तरांना नकारात्मक गुणपद्धती नाही. त्यामुळे गुण मिळवण्यासाठी मराठी एक चांगला विषय आहे. परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये मराठी विषयाचा पहिला पेपर असतो. तोच जर चांगला लिहिला गेला तर `चांगली सुरुवात अर्धे अधिक काम जिंकून देते' याचा प्रत्यय येतोच.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|