अधिकारी होण्याची सक्षमता उमेदवारात आहे की नाही, याचा अंदाज मुलाखतीत घेतला जातो. उमेदवारामधील आत्मविश्वास, दृष्टिकोन, प्रसंगावधान, चातुर्य, परिस्थिती हाताळण्याची हातोटी, मानसिक कणखरता, संयम, समाजाशी सुसंवाद साधण्याची कला इत्यादीची ही परीक्षा असते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १८६९ उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक होण्याची संधी यावर्षी दिली आहे.
गेल्या 10 वर्षांत प्रशासकीय सेवा परीक्षांविषयी जाणीव जागृती वाढल्यामुळे आणि अनेक विद्यार्थी आपल्या तयारीच्या जोरावर त्यात यशस्वी होऊ लागल्यामुळे आज स्पर्धापरीक्षा क्षेत्र हे एक आकर्षण केंद्र ठरले आहे. परिणामी, प्रशासकीय सेवा, त्या माध्यमातून प्राप्त होणारी नोकरीची शाश्वती, विविध सुविधा, सामाजिक स्थान याबरोबरच आव्हानात्मक करिअर आणि सामाजिक हस्तक्षेपाची संधी या घटकांमुळे विद्यार्थीवर्ग मोठया प्रमाणात स्पर्धा परीक्षेकडे वळताना दिसून येतो.
एमपीएससी आयोगाने काही दिवसांपूर्वी सहाय्यक पदासाठी परीक्षेची जाहिरात दिली. ही परीक्षा २९ सप्टेंबर २०१३ या दिवशी होणार आहे. पण या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण बदलला आहे. पोलिस सबइन्स्पेक्टर, सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक या पदांच्या परीक्षेसाठी यापूर्वी समान अभ्यासक्रम होता. आता तो बदलला आहे.
नक्कीच एमपीएससी कात टाकत आहे. परीक्षांमध्ये प्रश्नातील तोचतोचपणा संपूर्ण वगळला आहे. त्यामुळे अभ्यास साहित्यामध्येदेखील बदल अपेक्षित आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर नमूद केला आहे. त्यातील काही ठरावीक मुद्दयांची आपण चर्चा करूया. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्यसेवा लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी भरल्या जाणा-या पदांची माहिती जाहिरातीद्वारा प्रसिद्ध केली जाते. त्यावर नजर टाकल्यास दरवर्षी केद्रीय पातळीवर ८०० ते हजार तर राज्यपातळीवर ३०० ते ५०० एवढी शासकीय पदे भरली जातात, हे लक्षात येते. मात्र त्यासाठी सुमारे अडीच ते तीन लाख विद्यार्थी अर्ज करीत असतात.
शासनाचे विविध विभाग उदा. विक्रीकर, पोलीस इ. विभागात उमेदवारांची निकड भासते, त्या वेळी आयोग विक्रीकर निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक व मंत्रालय सहायक अशा पदांसाठी परीक्षा घेते. अगदी लिपिक या संवर्गासाठीसुद्धा आयोग परीक्षा घेते.
वस्तुतः केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही सुरुवातीपासूनच विद्याथ्र्यांचा कस पाहाणारी सर्वसमावेशक आणि आव्हानात्मक परीक्षा मानली जाते. या सेवेचा जगातील फ्रेंच नागरी सेवा परीक्षेपाठोपाठ कठीण परीक्षा म्हणून लौकिक आहे. केंद्र लोक आयोगाने या परीक्षांचे निःष्पक्ष, पारदर्शी आणि कार्यक्षमपणे आयोजन करून स्वच्छ कारभाराचा पायंडा रूढ केला आहे.
मुलाखत हा केंद्र लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतील शेवटचा आणि महत्त्वपूर्ण टप्पा असतो. उमेदवाराचे अंतिम यादीतील स्थान निश्चित करण्यात हा टप्पा निर्णायक ठरू शकतो. म्हणूनच यात जास्तीत जास्त गुण मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवणे अत्यावश्यक आहे. यूपीएससीने २७५ गुणांसाठी तर एमपीएससीने १०० गुणांसाठी मुलाखतीचा अंतिम टप्पा निर्धारित केलेला आहे. लोकसेवा आयोगाने मुलाखतीस व्यक्तिमत्त्व चाचणी असे संबोधले आहे. मुलाखतीचा हेतू उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व सनदी सेवा पदासाठी सक्षम आहे किंवा नाही याची तपासणी करणे होय.
यश प्रत्येकालाच हवं असतं, पण ते मिळवण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणंदेखील आवश्यक असतं. बरेचदा प्रयत्न करूनही यश पदरात पडत नाही. अशा वेळी पदरी निराशा येऊ शकते. पण त्यावेळी आपण केलेल्या चुकांचं निरीक्षण करून त्या चुका पुन्हा न करता अचूकपणे मार्गक्रमण केल्यास यशाची पायरी नक्कीच चढता येऊ शकते. यश मिळवण्यासाठी कुठलेही प्रयत्न करताना काही महत्त्वाच्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात.
जगाच्या पाठीवर कुठेही गेलोतरी बँक हि सापडणारच. आर्थिक क्षेत्रात बँकिंगचा महत्त्वाचा वाटा आहे. बदलत्या, खुल्या अर्थ-व्यवस्थेत, जागतिकीकरणाच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत बँकांचा तितकाच मौल्यवान सहभाग आहे. व्यापाराची..व्यवसायाची बदलती रूपं, देशा-देशांच्या सीमा पुसून आयात-निर्यातीला आलेला वेग, डॉलरपाठोपाठ युरोचे वाढते साम्राज्य, संगणक-इंटरनेटच्या माध्यमातून शीघ्र पेमेंट सिस्टिम, ई कॉमर्सच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलेलं ई-बँकिंग अशा सगळ्या घडामोडीत बँकिंग हे क्षेत्र व्यापक होते आहे
आज विद्याथ्र्यांना अद्ययावत विज्ञानतंत्र्, तंत्रज्ञान, शिक्षण-करिअरमधील प्रचंड स्पर्धा यासारख्या वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. ते पेलताना विद्याथ्र्यांच्या बुद्धिमत्ता आणि कौशल्याची कसोटी लागते. मुलाचा शिक्षणक्रम निवडण्याच्या वेळेस मुलाची भावनिक, सामाजिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासाची पातळी पालकांना समजणे अधिकाधिक अवघड होत आहे
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|