केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्यसेवा लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी भरल्या जाणा-या पदांची माहिती जाहिरातीद्वारा प्रसिद्ध केली जाते. त्यावर नजर टाकल्यास दरवर्षी केद्रीय पातळीवर ८०० ते हजार तर राज्यपातळीवर ३०० ते ५०० एवढी शासकीय पदे भरली जातात, हे लक्षात येते. मात्र त्यासाठी सुमारे अडीच ते तीन लाख विद्यार्थी अर्ज करीत असतात.
वस्तुतः केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही सुरुवातीपासूनच विद्याथ्र्यांचा कस पाहाणारी सर्वसमावेशक आणि आव्हानात्मक परीक्षा मानली जाते. या सेवेचा जगातील फ्रेंच नागरी सेवा परीक्षेपाठोपाठ कठीण परीक्षा म्हणून लौकिक आहे. केंद्र लोक आयोगाने या परीक्षांचे निःष्पक्ष, पारदर्शी आणि कार्यक्षमपणे आयोजन करून स्वच्छ कारभाराचा पायंडा रूढ केला आहे.
मुलाखत हा केंद्र लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतील शेवटचा आणि महत्त्वपूर्ण टप्पा असतो. उमेदवाराचे अंतिम यादीतील स्थान निश्चित करण्यात हा टप्पा निर्णायक ठरू शकतो. म्हणूनच यात जास्तीत जास्त गुण मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवणे अत्यावश्यक आहे. यूपीएससीने २७५ गुणांसाठी तर एमपीएससीने १०० गुणांसाठी मुलाखतीचा अंतिम टप्पा निर्धारित केलेला आहे. लोकसेवा आयोगाने मुलाखतीस व्यक्तिमत्त्व चाचणी असे संबोधले आहे. मुलाखतीचा हेतू उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व सनदी सेवा पदासाठी सक्षम आहे किंवा नाही याची तपासणी करणे होय.
यश प्रत्येकालाच हवं असतं, पण ते मिळवण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणंदेखील आवश्यक असतं. बरेचदा प्रयत्न करूनही यश पदरात पडत नाही. अशा वेळी पदरी निराशा येऊ शकते. पण त्यावेळी आपण केलेल्या चुकांचं निरीक्षण करून त्या चुका पुन्हा न करता अचूकपणे मार्गक्रमण केल्यास यशाची पायरी नक्कीच चढता येऊ शकते. यश मिळवण्यासाठी कुठलेही प्रयत्न करताना काही महत्त्वाच्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात.
आज विद्याथ्र्यांना अद्ययावत विज्ञानतंत्र्, तंत्रज्ञान, शिक्षण-करिअरमधील प्रचंड स्पर्धा यासारख्या वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. ते पेलताना विद्याथ्र्यांच्या बुद्धिमत्ता आणि कौशल्याची कसोटी लागते. मुलाचा शिक्षणक्रम निवडण्याच्या वेळेस मुलाची भावनिक, सामाजिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासाची पातळी पालकांना समजणे अधिकाधिक अवघड होत आहे
अभ्यास करा असा धोषा सगळेच जणं लावतात. परंतु, दहावी, बारावी आणि ग्रॅज्युएशन करताना त्या-त्या पातळीवर नेमक काय करायचं, याच्या थेट ११ टिप्स तुम्हांला देत आहेत.
मुलाखती मध्ये पुढील गोष्टी तपासल्या जातात.
१.बौद्धिक दक्षता (मेंटल अलर्टनेस) २.क्रिटिकल पॉवर ऑफ अॅसिमलेशन, समीक्षणात्मक दृष्टिकोनातून विचार आत्मसात करण्याची प्रवृत्ती. ३.स्पष्ट आणि तार्कीक स्पष्टीकरण. ४.परीक्षणातील समतोल. ५.छंद/आवड यामधील विविधता तसेच सखोलता. ६.सामाजिक दायित्व व समाजाभिमुखता. ७.बौद्धिक आणि नैतिक बांधिलकी. गुन्हे अन्वेषणाचं काम करण्याची अनेकांची इच्छा असते. सी.बी.आय.मध्ये जाण्यासाठी काय करावं, याबद्दल माहिती जाणून घेण्याची उत्कंठा आपल्या मध्ये असते.
सी.बी.आय.ची स्थापना १९६३ मध्ये झाली. प्रामुख्याने आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार, सरकारी नोकर व उच्चपदस्थांचा भ्रष्टाचार, दहशतवाद, बॉम्बस्फोट, माफिया, अंडरवल्र्ड आदी बाबींमध्ये तपास करण्याचं काम सी.बी.आय. करतं. सी.बी.आय.मध्ये विविध प्रकारे भरती केली जाते. सर्वसामान्य जनतेचं रक्षण करणारा, गुंडाराज-भ्रष्टाचार या विरोधात लढणारा आणि त्याचवेळी स्वतःच्या करियरचा ग्राफ उंचावणारा असा पोलीस अधिकारी समाजाला हवा असतो.
खलनिग्रहणाय सदरक्षणाय हे ब्रीदवाक्य जपणा-या कर्तव्यदक्ष पोलीस अधिका-याची आज समाजव्यवस्थेला नितांत गरज आहे. किरण बेदी, जे.एफ. रिबेरो यांच्यासारख्या पोलीस अधिका-यांनी स्वतःच्या करियरसोबतच समाजाचं ऋणही फेडलेलं आहे. पोलीस अधिकारी बनण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. अशाच काही करियर मार्गाची ओळख करून घेणार आहोत. पुर्वपरीक्षा हा या परीक्षेतील महत्त्वाचा टप्पा असतो. प्रत्येक उमेदवाराची मुख्य परीक्षा आणि मुलाखत घेणं शक्य नसल्याने या पूर्वपरीक्षेतून हुशार, सर्वगुणसंपन्न आणि सगळ्या क्षेत्राचं ज्ञान असलेल्या उमेदवाराला निवडलं जातं. या पूर्वपरीक्षेची माहिती करून घेऊया. या परीक्षेसाठी दोन पेपर असतात.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|