ज्यांना परीक्षेची खरोखर भीती वाटत नाही, अशा विद्याथ्र्यांमध्ये काही गुण प्रकर्षाने दिसतात. ते म्हणजे वेळेचे व्यवस्थापन, अभ्यासाचे नियोजन व सकारात्मक दृष्टिकोन या बाबी सर्वात महत्त्वाच्या असतात. या तिन्ही बाबी जन्मजात नसतात; परंतु प्रयत्न केल्यास त्या सहज आत्मसात करता येतात. त्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांच्या प्रयत्नांची गरज असते.
परीक्षेआधीच निकालाचे टेन्शन
दुसरा विषय म्हणजे रिझल्ट अपेक्षेप्रमाणे लागला नाही तर...? या प्रश्नाचे परीक्षेआधीच बरेचसे विद्यार्थी टेन्शन घेतात आणि मग त्याचा परिणाम परीक्षेतील परफॉर्मन्सवर होतो. अशा वेळी जीव घाबरणे, हातापायाला मुंग्या येणे, आत्मविश्वास कमी होणे अशी लक्षणे सामान्यपणे दिसतात.
उपाय काय?
ज्या विद्याथ्र्यांना परीक्षेची खरोखर भीती वाटत नाही, अशा विद्याथ्र्यांमध्ये काही गुण प्रकर्षाने दिसतात. ते म्हणजे वेळेचे व्यवस्थापन, अभ्यासाचे नियोजन व सकारात्मक दृष्टिकोन या बाबी सर्वात महत्त्वाच्या असतात. या तिन्ही बाबी जन्मजात नसतात; परंतु प्रयत्न केल्यास त्या सहज आत्मसात करता येतात. त्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांच्या प्रयत्नांची गरज असते. माझ्या मते, सुरुवातीला प्रत्येक परीक्षार्थीने स्वतःला प्रामाणिकपणे खालील प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे. ही परीक्षा माझ्यासाठी महत्त्वाची आहे का? (केवळ आई- वडील/शिक्षक म्हणतात म्हणून अभ्यास करायला किंवा परीक्षेला बसण्यात अर्थ नाही. तुम्हाला स्वतःला परीक्षेचे महत्त्व समजायला हवे. परीक्षा मला महत्त्वाची वाटत असेल तर अभ्यासासाठी मेहनत घ्यायची माझी तयारी आहे का? मी स्वतःकडून (माझा झालेला अभ्यास आणि बुद्धिमत्तेनुसार) काय रास्त अपेक्षा ठेवू शकतो? एकदा या प्रश्नांची उत्तरे मिळाली की वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरते. नियोजन करताना अभ्यासाप्रमाणेच झोप व मनोरंजनासाठीही पुरेसा वेळ देणे आवश्यक.
प्रयत्नांवर विश्वास
अभ्यासाच्या नियोजनात चार महत्त्वाच्या भागांकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. वाचन, चिंतन-मनन, सराव व तज्ज्ञ-शिक्षकांचे मार्गदर्शन हे ते चार महत्त्वाचे भाग आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे भूतकाळातील अपयशाचा विचार न करता फक्त येणा-या परीक्षेचा विचार करणे, आपला स्वतःवर व स्वप्रयत्नांवर दृढविश्वास असणे. तसेच यदाकदाचित अपयश आल्यास त्याला खंबीरपणे सामोरे जाण्याची मानसिक तयारी ठेवणेही गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे. त्या म्हणजे आपल्याबरोबरच्या विद्याथ्र्यांशी तुलना, स्वतःच्या प्रयत्नांकडे लक्ष न देता देवादिकांच्या आशीर्वादासाठी अवाजवी धडपड व आपल्या सध्याच्या समस्यांबद्दल इतरांना दोष देण्याची मानसिकता. परीक्षेच्या तयारीत पालक आणि शिक्षकांचा वास्तववादी व सम्यक सहभाग अत्यंत गरजेचा आहे. तथापि, काही गोष्टी त्यांनीही कटाक्षाने केल्या पाहिजेत. उदा. पाल्याच्या स्ट्रॉँग पॉइंट्सवर लक्ष केंद्रित करून त्याला प्रोत्साहन देणे. तसेच परीक्षा परीक्षार्थींच्या उन्नतीसाठी आहे; इतरांशी स्पर्धा करण्यासाठी नव्हे, ही जाणीव असावी. प्रयत्न करूनही पाल्याला अपयश आल्यास त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची तयारी आणि जेव्हा गरज असेल तेव्हा एक `जादू की झप्पी' देण्यासाठी पुढाकार घेणेही आवश्यक आहे. शिवाय काही बाबी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. उदा. इतर मुलांशी तुलना, पाल्याला त्याच्या भूतकालीन अपयशाची आठवण करून देणे, पाल्याकडून अवाजवी व अवास्तव अपेक्षा बाळगणे पालकांनी टाळावे. वेळेचे व्यवस्थापन, अभ्यासाचे नियोजन व सकारात्मक दृष्टिकोन या त्रिसूत्रीचा अंगीकार केल्यास परीक्षेच्या भीतीवर सहज मात करता येईल. ऑल द बेस्ट!