अभ्यासातील रटाळपणा कमी होतो आणि अभ्यासाचा कंटाळा येत नाही. शिवाय एकदा शिकलेल्या गोष्टी दीर्घकाळ स्मरणात राहतात.
अभ्यास चर्चा ग्रुप- अभ्यास शक्यतो एकटेपणी न करता समवयस्क मित्रांसोबत करावा. अभ्यासाबद्दल मित्रांसोबत चर्चा करावी. चर्चा हा तपशीलवार अभ्यासा'चा अजून एक प्रभावी मार्ग आहे. इतरांशी चर्चा करताना किंवा त्यावर इतरांची मते ऐकताना एकदा वाचलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती होते. त्यामुळे गोष्टी सहजपणे स्मरणात राहतात.
क्षणभर विश्रांती - शिकण्याची प्रक्रिया ही मुख्यत: मेंदूच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी मेंदूचे स्वास्थ्य अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी पुरेशी झोप घेणे, मानसिक ताणतणाव टाळणे, मोकळ्या वेळात खेळ खेळणे, आपले छंद जोपासणे आवश्यक आहे.
ताजेपणा आणि प्रसन्नता- शक्यतो सकाळच्या प्रसन्न वातावरणात अभ्यास करावा. सकाळच्या वेळेत मेंदू सर्वाधिक कार्यक्षमपणे काम करतो. त्यामुळे सकाळच्या वेळेत अभ्यास करणे लाभदायक ठरते.
आनंददायी व ज्ञानदायी अभ्यास- अभ्यासाकडे केवळ शालेय परीक्षा पास होण्याच्या दृष्टीने न पाहता, अभ्यास ही ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया आहे हे लक्षात ठेवावे. कारण अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदल्यामुळे अभ्यासाची पद्धतही बदलते आणि भविष्यातील स्पर्धेत टिकण्यासाठी त्याचा फायदा होतो.