महाजनपदांव्यतिरिक्त काही गणसंघांचे अस्तित्वही महत्त्वाचे ठरते. मौर्य साम्राज्य हे भारतातील पहिले व एक वैभवशाली साम्राज्य म्हणून गणले जाते. मौर्याच्या या काळातील कौटिल्याचे अर्थशास्त्र (या १५ पुस्तकांच्या नेमक्या कालखंडाबाबत वाद आहे.) अशोकचे स्तंभ व शिलालेख, अशोकाचा धम्म (हा धर्म नसनू एक संहिता आहे), बौद्ध धर्माचा प्रसार, स्तूप, विहार, चैत्य यातील वास्तुकला यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. मौर्य साम्राज्याने जवळपास संपूर्ण भारतीय उपखंडाला एक केंद्रिभूत प्रशासन दिले व त्यातून रस्ते, कालवे, सिंचन यांसारख्या पायाभूत सुविधांचा विकास केला. या पायाचा उपयोग पुढील कालखंडातील (मौर्योत्तर /गुप्तपूर्व ) आर्थिक भरभराटीला झाला. याव्यतिरिक्त ग्रीक, शक, पहलव, कुशाण यांच्या या आक्रमणांमुळे जगातील अनेक भागांची भारतीय व्यापार्यांना ओळख झाली. उत्तर-पश्चिमी भागात ग्रीक, शक, पहलव, कुशाण यांची राज्ये, पूर्वेकडे मौर्याना उलथवून टाकणारे शुंग राज्य, दक्षिण मध्य भागात सातवाहनांचे राज्य, दक्षिणेत चोल, चेरा, पाण्डय, चालुक्य, काकतिय, होयसाळ इत्यादींची राज्ये असा काहीसा राजकीय पट दिसतो. या राजकीय विकेंद्रीकरणातून निर्माण झालेल्या स्वायत्ततेमुळे या काळात व्यापार, साहित्य, विज्ञान, कला, वास्तुकला अशा अनेक क्षेत्रांत मोठी प्रगती दिसून येते. या काळातील समाजाला स्थैर्य प्राप्त करून देणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे श्रेणी होय. अनेक इतिहासकारांच्या मते, श्रेणींमधूनच भारतामध्ये संकीर्ण जातींचा उदय होतो. श्रेणींच्या माध्यमातून व्यापारास मोठी चालना मिळाली व भारताचा परकीय व्यापार वाढला. धातूकाम, वस्त्रोद्योग, मौल्यवान खडे, मोती, हस्तिदंत, काच, नाणी या उद्योगधंद्यांमध्ये मोठी प्रगती दिसून येते. यातून निर्माण झालेल्या समृद्धीचा परिणाम मौर्योत्तर व गुप्त काळातील समृद्ध सांस्कृतिक अभिव्यक्तीवर स्पष्ट जाणवतो. गांधार, मथुरा, अमरावती ही वैशिष्टयपूर्ण कलेची केंद्रे, धर्मशास्त्र, वेदांग, पुराण या स्मृती साहित्याची निर्मिती, वैद्यकशास्त्र (चरक, शुश्रूत), संस्कृत व्याकरण (पाणिनी, पतांजली), नाटके व काव्य (हाल, अश्वघोष, भाष, वात्सायन), महायान बौद्ध तत्त्वज्ञान (नागार्जुनाचे माध्यमिक तत्त्वज्ञान, मिलदपान्हो), सहा पारंपरिक तत्त्वज्ञानांचा विकास (सांख्य, योग वैषेशिक, न्याय, वेदान्त व मीमांसा), भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान यांचा समावेश या काळातील संस्कृतीमध्ये होतो. तद्वतच या काळात दक्षिण भारतामध्ये संगम साहित्याची निर्मिती होते. संस्कृतीचा अभ्यास ऐतिहासिक उत्क्रांतीच्या अनुषंगाने करणे उपयुक्त ठरते. कोणत्याही कालखंडाच्या संस्कृतीचा अभ्यास करताना तत्कालीन सामाजिक, आर्थिक व राजकीय संदर्भाचा अभ्यास आवश्यक ठरतो. सिंधू संस्कृतीच्या कालखंडापासून मौर्योत्तर कालखंडापर्यंतचा संस्कृतीच्या प्रवासाच्या सारांशाचा आपण वेध घेण्याचा प्रयत्न या लेखात केला. त्याचा संदर्भासहित सखोल अभ्यास आयोगाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा ठरतो.
सिंधू संस्कृतीमध्ये त्या संस्कृतीची वैशिष्टये, महत्त्वाची शहरे, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, समाज, धार्मिक धारणा, लिपी, मृतदेह पुरण्याच्या पद्धती, महत्त्वाचे अवशेष व त्यांचा अर्थ आणि या संस्कृतीचा र्हास यांचा अंतर्भाव होतो. सिंधू संस्कृती व आर्याचे आगमन यांबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. सिंधू संस्कृतीचे लोक व आर्य यांच्यामध्ये कोणता असा संबंध होता की सिंधू संस्कृतीच्या संपूर्ण र्हासानंतर आर्य आले हा मतभेदाचा मुख्य मुद्दा ठरतो. वैदिक काळापासून पुढे मात्र भारतीय इतिहास एका विशिष्ट उत्क्रांतीची साखळी दर्शवितो. वैदिक काळाची विभागणी दोन कालखंडात केली जाते- ऋग्वेदिक काळ व नंतरचा वैदिक काळ. कारण ऋग्वेद रचला गेलेला काळ व त्यानंतरचा काळ हे उत्क्रांतीचे दोन टप्पे दर्शवितात. ऋग्वेदिक काळातील भटकी अर्थव्यवस्था नंतरच्या वैदिक काळात शेतीप्रधान होते. ऋग्वेदिक काळातील धार्मिक धारणा या साध्यासोप्या होत्या. देवाची साधी गद्य स्तुती ही पूजा होती. बालविवाहाची प्रथा नव्हती तर विधवा पुनर्वविवाहास संमती होती. स्त्रियांना शिक्षणाचा व सार्वजनिक सभांमध्ये सहभागाचा हक्क होता. इतकेच नव्हे तर ऋग्वेदाच्या काही ऋचा या स्त्रियांनी रचल्या. नंतरच्या वेदिक काळात देवाची पद्य स्तुती (सामवेद), मंत्रांचा वापर (यजुर्वेद), जादूई मंत्रांचा वापर (अथर्ववेद) असा प्रवास दिसतो. याबरोबरच नंतरच्या वेदिक काळात यज्ञविधी व पशुबळी यांचे स्तोम वाढताना दिसते. ब्राह्मण या साहित्यप्रकारामध्ये विधीशास्त्रांचा ऊहापोह दिसतो. यज्ञविधी व पशुबळी यांच्या अतिरेकाला पहिली प्रतिक्रिया म्हणजे अरण्यक (ध्यानातून ज्ञानप्राप्ती) व उपनिषद (तत्त्वज्ञान) ही साहित्यकृती होय. या दोन्ही साहित्यकृतींनी विधींच्या अतिरेकावर टीका केली. ही प्रतिक्रिया मात्र वैदिक धर्मातर्गत प्रतिक्रिया ठरते. विधी व पशुबळी यांच्या अतिरेकाला मिळालेल्या प्रतिक्रियांपकी वेदिक धर्माच्या अधिसत्तेला अमान्य करत वेगळे पर्याय निर्माण करणारी प्रतिक्रिया म्हणजे वेदोत्तर/मौर्यपूर्व काळात ६४ वेगवेगळ्या पंथांचा उदय. या ६४ पंथांपकी जैन व बौद्ध धर्मानी ख-या अर्थानी वैदिक धर्माला पर्याय निर्माण केला व त्याहीपुढे जाऊन बौद्ध धर्माने नवे आव्हान निर्माण केले. या दोन्ही धर्माच्या तत्त्वज्ञानाचा (जैन व बौद्ध साहित्य) सखोल अभ्यास आवश्यक ठरतो. या तत्त्वज्ञानाने भारतामध्ये धार्मिक सुधारणेचा पाया घातला व भारतीय समाज व संस्कृतीवर दूरगामी परिणाम केला. या व्यतिरिक्त या काळातील महत्त्वाची बाब म्हणजे महाजनपदांचा उदय. हासुद्धा एका तार्किक उत्क्रांतीचा टप्पा ठरतो. ऋग्वेदिक काळातील भटक्या टोळ्या (जन) नंतरच्या वैदिक काळात स्थायिक होतात (जनपद). स्थर्य प्राप्त झालेल्या मानवी वसाहतींची वाटचाल स्थिर शेती, अधिकचं उत्पादन यातून नागरिकीकरणाकडे (महाजनपदे) होते. या नागरी केंद्रांभोवती (महाजनपदे) राज्यांची निर्मिती होते. विविध स्त्रोतांमध्ये वेगवेगळे आकडे जरी असले तरी १६ महाजनपदांचा उदय मान्य केला जातो. यापकी वत्स, अवंती, कोसल व मगध ही बुद्धांच्या काळातील महत्त्वाची महाजनपदं होय. सर्व महाजनपदांमध्ये मगध सर्वश्रेष्ठ ठरते. मौर्यापूर्वी हिरण्यक (बबीसार, अजातशत्रू, उदयी इ.), शिशुनाग व नंद या घराण्यांनी मगधवर राज्य केले व त्याचा विस्तार केला. या काळातील तिसरा महत्त्वाचा धागा म्हणजे पारशी व ग्रीकांची परकीय आक्रमणे व त्यातून झालेली सांस्कृतिक देवाण- घेवाण. भारतावर आक्रमण करणारा सायरस हा र्पिशयन सम्राट होता, तर नंदांच्या काळात अलेक्झांडरचे आक्रमण होते.
महाजनपदांव्यतिरिक्त काही गणसंघांचे अस्तित्वही महत्त्वाचे ठरते. मौर्य साम्राज्य हे भारतातील पहिले व एक वैभवशाली साम्राज्य म्हणून गणले जाते. मौर्याच्या या काळातील कौटिल्याचे अर्थशास्त्र (या १५ पुस्तकांच्या नेमक्या कालखंडाबाबत वाद आहे.) अशोकचे स्तंभ व शिलालेख, अशोकाचा धम्म (हा धर्म नसनू एक संहिता आहे), बौद्ध धर्माचा प्रसार, स्तूप, विहार, चैत्य यातील वास्तुकला यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. मौर्य साम्राज्याने जवळपास संपूर्ण भारतीय उपखंडाला एक केंद्रिभूत प्रशासन दिले व त्यातून रस्ते, कालवे, सिंचन यांसारख्या पायाभूत सुविधांचा विकास केला. या पायाचा उपयोग पुढील कालखंडातील (मौर्योत्तर /गुप्तपूर्व ) आर्थिक भरभराटीला झाला. याव्यतिरिक्त ग्रीक, शक, पहलव, कुशाण यांच्या या आक्रमणांमुळे जगातील अनेक भागांची भारतीय व्यापार्यांना ओळख झाली. उत्तर-पश्चिमी भागात ग्रीक, शक, पहलव, कुशाण यांची राज्ये, पूर्वेकडे मौर्याना उलथवून टाकणारे शुंग राज्य, दक्षिण मध्य भागात सातवाहनांचे राज्य, दक्षिणेत चोल, चेरा, पाण्डय, चालुक्य, काकतिय, होयसाळ इत्यादींची राज्ये असा काहीसा राजकीय पट दिसतो. या राजकीय विकेंद्रीकरणातून निर्माण झालेल्या स्वायत्ततेमुळे या काळात व्यापार, साहित्य, विज्ञान, कला, वास्तुकला अशा अनेक क्षेत्रांत मोठी प्रगती दिसून येते. या काळातील समाजाला स्थैर्य प्राप्त करून देणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे श्रेणी होय. अनेक इतिहासकारांच्या मते, श्रेणींमधूनच भारतामध्ये संकीर्ण जातींचा उदय होतो. श्रेणींच्या माध्यमातून व्यापारास मोठी चालना मिळाली व भारताचा परकीय व्यापार वाढला. धातूकाम, वस्त्रोद्योग, मौल्यवान खडे, मोती, हस्तिदंत, काच, नाणी या उद्योगधंद्यांमध्ये मोठी प्रगती दिसून येते. यातून निर्माण झालेल्या समृद्धीचा परिणाम मौर्योत्तर व गुप्त काळातील समृद्ध सांस्कृतिक अभिव्यक्तीवर स्पष्ट जाणवतो. गांधार, मथुरा, अमरावती ही वैशिष्टयपूर्ण कलेची केंद्रे, धर्मशास्त्र, वेदांग, पुराण या स्मृती साहित्याची निर्मिती, वैद्यकशास्त्र (चरक, शुश्रूत), संस्कृत व्याकरण (पाणिनी, पतांजली), नाटके व काव्य (हाल, अश्वघोष, भाष, वात्सायन), महायान बौद्ध तत्त्वज्ञान (नागार्जुनाचे माध्यमिक तत्त्वज्ञान, मिलदपान्हो), सहा पारंपरिक तत्त्वज्ञानांचा विकास (सांख्य, योग वैषेशिक, न्याय, वेदान्त व मीमांसा), भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान यांचा समावेश या काळातील संस्कृतीमध्ये होतो. तद्वतच या काळात दक्षिण भारतामध्ये संगम साहित्याची निर्मिती होते. संस्कृतीचा अभ्यास ऐतिहासिक उत्क्रांतीच्या अनुषंगाने करणे उपयुक्त ठरते. कोणत्याही कालखंडाच्या संस्कृतीचा अभ्यास करताना तत्कालीन सामाजिक, आर्थिक व राजकीय संदर्भाचा अभ्यास आवश्यक ठरतो. सिंधू संस्कृतीच्या कालखंडापासून मौर्योत्तर कालखंडापर्यंतचा संस्कृतीच्या प्रवासाच्या सारांशाचा आपण वेध घेण्याचा प्रयत्न या लेखात केला. त्याचा संदर्भासहित सखोल अभ्यास आयोगाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा ठरतो. Comments are closed.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|