काही विद्यार्थी पदवी मिळाल्यावर स्पर्धा परीक्षांचा विचार करतात; परंतु हा अयोग्य निर्णय आहे. सरकारी नोकरीसाठी दहावी, बारावी, पदवी हे तीन टप्पे आहेत. `एमपीएससी`ची लिपिक-टंकलेखक ही परीक्षा दहावीनंतर असते; तसेच डिफेन्स व इतर ठिकाणी दहावीनंतरही स्पर्धा परीक्षा देऊन नोकरी मिळवता येते. मात्र, या ठिकाणी टायपिंगचे ज्ञान आवश्यक आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनची क्लार्क ग्रेड परीक्षा बारावीनंतरही देता येते. यासाठीही टायपिंग किंवा डाटा एन्ट्रीचे ज्ञान आवश्यक आहे.
पदवीनंतर तर करिअरच्या व अधिकारी पदांच्या नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी एमपीएससी, यूपीएससी, एसएससी, आयबीपीएस, रेल्वे, नाबार्डच्या विविध स्पर्धा परीक्षा दरवर्षी नियमितपणे आयोजित केल्या जातात. जानेवारी महिन्यात परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध होते. विविध पदांच्या परीक्षा घेतल्या जातात. यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखती इत्यादींचा समावेश असतो. दर आठवड्याला न चुकता एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर घ्या. त्यानुसार `वेळेत' अर्ज करा.
कॉलेजच्या विद्याथ्र्यांनी पदवीच्या पहिल्या वर्षापासूनच स्पर्धा परीक्षांचे टाइम मॅनेजमेंट करावे. दोन-तीन वर्षांच्या स्पर्धा परीक्षा फाउंडेशन कोर्सला प्रवेश घ्यावा. स्पर्धा परीक्षांची पुस्तके, प्रश्नसंच, संदर्भ ग्रंथ, मासिके; तसेच इतर स्टडी मटेरिअल घ्यावे. यशस्वी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घ्याव्यात किंवा वाचाव्यात. आजकाल सगळ्या प्रकारच्या नोकर्यांसाठी स्पर्धा परीक्षा द्यावीच लागते. म्हणून आपण स्पर्धा परीक्षेला अर्ज केल्यापासून परीक्षेपर्यंत अभ्यासाचे नियोजन व टाइम मॅनेजमेंट करावेच लागते. वेळ थोडा असतो व अभ्यास जास्त असतो. स्पर्धा परीक्षेतही प्रश्नसंख्या जास्त व वेळ मर्यादित असतो. त्यात भर म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टिम असते. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना विषयवार वेळेचे नियोजन करावे; तसेच वेळ लावून आधीच्या परीक्षांच्या व नमुना प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करावा. यासाठी वेळेचे नियोजन केले पाहिजे.