काही विद्यार्थी क्षमता असून आणि प्रयत्न करूनही अपात्र ठरतात, यास अनेक घटक कारणीभूत असतात. म्हणूनच आपल्या बाबतीत असे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, याची जाणीव असणे संयुक्तिक ठरते. थोडक्यात यूपीएससी- एमपीएससी म्हणजे जीवन नव्हे याचे भान ठेवून आपण ठरवलेल्या कालमर्यादेत या परीक्षांचा प्रभावी अभ्यास करण्यावर लक्ष देणे साहाय्यभूत ठरेल. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसंदर्भातील आणखी एक कळीचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांने आपल्या आयुष्यातील किती वर्षे यासाठी राखीव ठेवावीत, हा होय. खरे पाहता एक वर्षांचा ११-१२ तासांचा नियोजित व परीक्षाभिमुख अभ्यास ही या परीक्षेची किमान गरज आहे, हे लक्षात येते. त्यानंतर प्रत्यक्ष परीक्षा प्रक्रियेचे एक वर्ष अशी एकूण पूर्ण दोन वर्षे या परीक्षांसाठी निर्धारित करावीत. दोन वर्षांचा अभ्यास आणि एका संपूर्ण परीक्षेचा अनुभव हे या परीक्षेसाठी किमान प्रयत्न मानता येतील. या प्रयत्नात यश प्राप्त झाले तर प्रश्नच नाही. मात्र, अपयश आले तर या टप्प्यावर एका बाजूला स्पर्धा परीक्षा देताना, पर्यायी करिअरची सुरुवात करणे उपयुक्त ठरते. अर्थात हा निर्णय विद्यार्थी-पालकांनी स्वतची सामाजिक- शैक्षणिक, आर्थिक पाश्र्वभूमी; आत्तापर्यंत केलेल्या परीक्षेच्या तयारीची स्थिती आणि संभाव्य करिअरची संधी इ. विविध घटकांचा विचार करून घ्यावयाचा असतो. एखाद्याने किती वर्षे (पूर्ण वेळ) स्पर्धा परीक्षेला द्यावीत, हा निर्णय घेणे कठीण असते. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांची स्थिती भिन्न असते. संभाव्य जोखीम लक्षात घेऊन पर्यायाचा विचार करून, त्या दृष्टीने प्राथमिक पावले टाकणे केव्हाही इष्ट ठरते. वस्तुत बरेच विद्यार्थी दोन-तीन वर्षे पूर्णवेळ तयारी व प्रयत्न केल्यानंतर एका बाजूला परीक्षेसाठीचे प्रयत्न चालू ठेवतात आणि दुसर्या बाजूला एखादी नोकरीही करतात. अर्थात यासंदर्भात कोणतेच निश्चित असे सूत्र सांगणे कठीण आहे. तथापि, पर्यायी करिअरचा विचार करणे केव्हाही श्रेयस्कर एवढे मात्र नक्की. प्रत्यक्ष तयारी प्रक्रियेच्या काळातही विद्यार्थ्यांना (आणि पालकांनाही) विविध प्रकारच्या मानसिक ताणतणावांतून मार्ग मण करावे लागते. काही विद्यार्थी नोकरी सोडून, काही सुस्थापित पर्यायी करिअर सोडून, काही स्थिर करिअर करण्याची संभाव्य संधी सोडून, तर काही विद्यार्थी लहानपणापासून निर्धार करून या स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळतात. पहिल्या प्रयत्नातच अथवा वर्ष-दोन वर्षांतच यश प्राप्त होते, असे नाही. तसेच प्रत्येकाला यात अंतिमत यश मिळेलच, असेही नाही. त्यामुळे आपण ठरवलेल्या कालमर्यादेत, या परीक्षांची तयारी करताना सातत्यपूर्ण, नियोजित अभ्यास; जिद्द, चिकाटी आणि मेहनत तर घ्यावीच लागते. मात्र त्याचबरोबर निरनिराळ्या प्रकारच्या मानसिक तणावांचाही सामना करावा लागतो. आपल्या सहनशीलतेची कसोटी पाहणारी यासारखी दुसरी परीक्षा विरळाच. परीक्षेच्या तयारीच्या प्रारंभी जो उत्साह, आत्मविश्वास, जिद्द, ऊर्जा असते ती शेवटपर्यंत कशी टिकवून ठेवायची याची हातोटीही आत्मसात करावी लागते.
केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्यसेवा लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी भरल्या जाणा-या पदांची माहिती जाहिरातीद्वारा प्रसिद्ध केली जाते. त्यावर नजर टाकल्यास दरवर्षी केद्रीय पातळीवर ८०० ते हजार तर राज्यपातळीवर ३०० ते ५०० एवढी शासकीय पदे भरली जातात, हे लक्षात येते. मात्र त्यासाठी सुमारे अडीच ते तीन लाख विद्यार्थी अर्ज करीत असतात. म्हणजे व्यापक स्वरूपातील स्पर्धेमुळे अंतिमत: निवड होणा-या विद्याथ्र्यांचे प्रमाण हे अत्यल्प असते. नियोजित अभ्यास, जिद्द, चिकाटी या आधारे यश मिळवता येते, यात शंका नसली तरी, या व्यापक स्वरूपाच्या स्पध्रेची जाणीव असणे हे प्रत्येक विद्यार्थी, पालक व मार्गदर्शकांची जबाबदारी आहे. त्यामुळे या परीक्षांकडे वळण्यापूर्वी अथवा वळत असताना आपल्याकडे एखादा पर्याय असणे अथवा त्याचा विचार केलेला असणे अत्यावश्यक ठरते. एकदा या पर्यायाचा विचार केला की, मग आपली सर्व ऊर्जा या परीक्षांच्या तयारीत गुंतवणे अधिक सोयीस्कर ठरते. अन्यथा या परीक्षांत अपयश आले आणि आपण पर्यायाचा अजिबातच विचार केलेला नसेल तर विद्यार्थी निराश होण्याचीच शक्यता असते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे विद्याथ्र्यांनी स्पर्धा परीक्षेलाच सर्वस्व मानता कामा नये. म्हणजे, यात यश प्राप्त झाले तरच आपण आपल्या जीवनात यशस्वी झालो आणि या परीक्षेत अपयशी ठरलो तर आपले जीवनच निरर्थक आहे, अशा रीतीने स्पर्धा परीक्षेचा विचार करणे धोकादायक आहे. यातून आपण आपलेच खच्चीकरण करण्याची शक्यता अधिक आहे. वस्तुत: विद्यार्थी सर्वस्व पणास लावून उमेदीची काही वर्षे या परीक्षांचा अभ्यास करतात. मात्र तरीही पदरी आलेल्या अपयशाला सामोरे जाणे, अत्यंत कठीण असले तरी, त्याचा समर्थपणे स्वीकार करावा लागतो.
काही विद्यार्थी क्षमता असून आणि प्रयत्न करूनही अपात्र ठरतात, यास अनेक घटक कारणीभूत असतात. म्हणूनच आपल्या बाबतीत असे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, याची जाणीव असणे संयुक्तिक ठरते. थोडक्यात यूपीएससी- एमपीएससी म्हणजे जीवन नव्हे याचे भान ठेवून आपण ठरवलेल्या कालमर्यादेत या परीक्षांचा प्रभावी अभ्यास करण्यावर लक्ष देणे साहाय्यभूत ठरेल. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसंदर्भातील आणखी एक कळीचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांने आपल्या आयुष्यातील किती वर्षे यासाठी राखीव ठेवावीत, हा होय. खरे पाहता एक वर्षांचा ११-१२ तासांचा नियोजित व परीक्षाभिमुख अभ्यास ही या परीक्षेची किमान गरज आहे, हे लक्षात येते. त्यानंतर प्रत्यक्ष परीक्षा प्रक्रियेचे एक वर्ष अशी एकूण पूर्ण दोन वर्षे या परीक्षांसाठी निर्धारित करावीत. दोन वर्षांचा अभ्यास आणि एका संपूर्ण परीक्षेचा अनुभव हे या परीक्षेसाठी किमान प्रयत्न मानता येतील. या प्रयत्नात यश प्राप्त झाले तर प्रश्नच नाही. मात्र, अपयश आले तर या टप्प्यावर एका बाजूला स्पर्धा परीक्षा देताना, पर्यायी करिअरची सुरुवात करणे उपयुक्त ठरते. अर्थात हा निर्णय विद्यार्थी-पालकांनी स्वतची सामाजिक- शैक्षणिक, आर्थिक पाश्र्वभूमी; आत्तापर्यंत केलेल्या परीक्षेच्या तयारीची स्थिती आणि संभाव्य करिअरची संधी इ. विविध घटकांचा विचार करून घ्यावयाचा असतो. एखाद्याने किती वर्षे (पूर्ण वेळ) स्पर्धा परीक्षेला द्यावीत, हा निर्णय घेणे कठीण असते. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांची स्थिती भिन्न असते. संभाव्य जोखीम लक्षात घेऊन पर्यायाचा विचार करून, त्या दृष्टीने प्राथमिक पावले टाकणे केव्हाही इष्ट ठरते. वस्तुत बरेच विद्यार्थी दोन-तीन वर्षे पूर्णवेळ तयारी व प्रयत्न केल्यानंतर एका बाजूला परीक्षेसाठीचे प्रयत्न चालू ठेवतात आणि दुसर्या बाजूला एखादी नोकरीही करतात. अर्थात यासंदर्भात कोणतेच निश्चित असे सूत्र सांगणे कठीण आहे. तथापि, पर्यायी करिअरचा विचार करणे केव्हाही श्रेयस्कर एवढे मात्र नक्की. प्रत्यक्ष तयारी प्रक्रियेच्या काळातही विद्यार्थ्यांना (आणि पालकांनाही) विविध प्रकारच्या मानसिक ताणतणावांतून मार्ग मण करावे लागते. काही विद्यार्थी नोकरी सोडून, काही सुस्थापित पर्यायी करिअर सोडून, काही स्थिर करिअर करण्याची संभाव्य संधी सोडून, तर काही विद्यार्थी लहानपणापासून निर्धार करून या स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळतात. पहिल्या प्रयत्नातच अथवा वर्ष-दोन वर्षांतच यश प्राप्त होते, असे नाही. तसेच प्रत्येकाला यात अंतिमत यश मिळेलच, असेही नाही. त्यामुळे आपण ठरवलेल्या कालमर्यादेत, या परीक्षांची तयारी करताना सातत्यपूर्ण, नियोजित अभ्यास; जिद्द, चिकाटी आणि मेहनत तर घ्यावीच लागते. मात्र त्याचबरोबर निरनिराळ्या प्रकारच्या मानसिक तणावांचाही सामना करावा लागतो. आपल्या सहनशीलतेची कसोटी पाहणारी यासारखी दुसरी परीक्षा विरळाच. परीक्षेच्या तयारीच्या प्रारंभी जो उत्साह, आत्मविश्वास, जिद्द, ऊर्जा असते ती शेवटपर्यंत कशी टिकवून ठेवायची याची हातोटीही आत्मसात करावी लागते.
Sadashiv paldewad
29/9/2013 12:14:25 pm
Comments are closed.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|