करिअरच्या दृष्टिने पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी बोर्ड परीक्षेतल्या गुणांना खूप महत्त्व असतं. त्यामुळे विद्यार्थी वर्षभर भरपूर अभ्यास करत असतात. या अभ्यासानंतर प्रत्यक्ष परीक्षेची वेळ जसजशी जवळ येते तसतसं अनेक विद्याथ्र्यांचं टेन्शन वाढायला लागतं. प्रत्यक्ष परीक्षेच्या काळातलं नियोजन योग्य पद्धतीने केल्यास परीक्षेत यश मिळवणं अवघड नाही.
नागरी सेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी वृत्तपत्रांचा अभ्यास अनिवार्य ठरतो. सर्वसाधारणपणे 30 ते 40 टक्के तर कधी कधी यापेक्षा अधिक वस्तुनिष्ठ प्रश्न वर्तमान घडामोडींवर विचारले जातात. मुख्य परीक्षेतील इतिहास, कला व संस्कृती घटक वगळता सामान्य अध्ययनाच्या पहिल्या तिन्ही पेपरमधील सर्व घटकांवरील प्रश्न, तसेच 125 गुणांचा एक निबंध वर्तमान घडामोडींवरच बेतलेला असतो. बहुतांश वेळा व्यक्तिमत्त्व चाचणीमध्ये वर्तमान घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. थोडक्यात नागरी सेवा परीक्षेच्या तिन्ही टप्प्यांवर वृत्तपत्रांचे वाचन अपरिहार्य बनते.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|