राज्य सेवा पूर्वपरीक्षा झाली. पेपर काहींना ठीक गेला असेल, काहींना अवघड, तर काहींना ब-यापकी चांगला. पेपर संपला तरी सहसा तो उमेदवारांची पाठ सोडत नाही. येथून पुढचे काही दिवस उत्तरतालिकेची वाट पाहण्यात, बरोबर किंवा चूक उत्तरांची संख्या शोधण्यात उमेदवारांचा वेळ जाईल. असे होणे स्वाभाविक असते. पूर्वपरीक्षेनंतरचा हा `शून्य काळ' अंदाज बांधण्यात खर्ची पडतो. तज्ज्ञ असे सुचवतात की, पूर्वपरीक्षेसाठी झोकून अभ्यास केला असेल तर पुढच्या तयारीला सज्ज होण्यापूर्वी दोन दिवसांचा आराम या शून्य काळात जरूर करावा. उत्तरे चूक की बरोबर हे शोधण्यात वेळ घालवू नका, असे कितीदा लिहिले-वाचले आणि ते पटले तरीही आपण स्वत:ला त्यापासून रोखू शकत नाही. निकालाची चिंता आणि उत्सुकता असणे स्वाभाविक आहे; पण एकदा पेपर संपला की, आपल्या हाती फक्त पुढच्या अभ्यासाचे नियोजन करणे आणि प्रत्यक्ष अभ्यास करणे एवढेच असते. पूर्वपरीक्षा आपण नक्की उत्तीर्ण होऊ असा काहींचा अंदाज असेल. काहींना आपण अपयशी ठरू असं वाटत असेल तर काही द्विधा मन-स्थितीत, संभ्रमात असतील; पण या सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकच समान योजना असेल. सर्वानी आपण मुख्य परीक्षा देणार आहोत असे गृहीत धरून पुढील अभ्यासाचे नियोजन करून अभ्यास सुरू करायला हवा.
लोकसेवा संघ आयोगाने नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वपरीक्षेमध्ये काही फेरबदल निश्चित केले आहेत. पूर्वपरीक्षेमधील कल चाचणी अर्थात सीसॅटच्या पेपरमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमागची पाश्र्वभूमी अनेकांना माहीत असेलच. इंग्रजी भाषेच्या काठिण्याबाबत आणि त्रुटी असलेल्या भाषांतराबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांमधून, विविध मागण्यांमधून हे बदल करण्याचे आयोगाने ठरवले आहे.
नागरी सेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी वृत्तपत्रांचा अभ्यास अनिवार्य ठरतो. सर्वसाधारणपणे 30 ते 40 टक्के तर कधी कधी यापेक्षा अधिक वस्तुनिष्ठ प्रश्न वर्तमान घडामोडींवर विचारले जातात. मुख्य परीक्षेतील इतिहास, कला व संस्कृती घटक वगळता सामान्य अध्ययनाच्या पहिल्या तिन्ही पेपरमधील सर्व घटकांवरील प्रश्न, तसेच 125 गुणांचा एक निबंध वर्तमान घडामोडींवरच बेतलेला असतो. बहुतांश वेळा व्यक्तिमत्त्व चाचणीमध्ये वर्तमान घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. थोडक्यात नागरी सेवा परीक्षेच्या तिन्ही टप्प्यांवर वृत्तपत्रांचे वाचन अपरिहार्य बनते.
यंदाच्या वर्षांच्या अंतिम परीक्षेपूर्वीचे आता हाती उरलेले दिवस म्हणजे परीक्षेच्या तयारीचा अंतिम टप्पाच म्हणावा लागेल. परीक्षेला बसलेल्या विद्याथ्र्यांचा अभ्यास तर सुमारे वर्षभर आधीपासूनच सुरू झालेला असतो. त्यामुळे परीक्षेच्या या अंतिम टप्प्यात केवळ सराव व्हायला हवा. यापुढच्या दिवसांत अभ्यास किती केला आणि कसा केला हे महत्त्वाचे ठरेल. अभ्यास करताना काही नाविन्यपूर्ण तंत्रं अवलंबणे क्रमप्राप्त आहे. कारण ज्याला इतरांहून जास्त आणि इतरांपेक्षा वेगळं असं मिळवायचं असतं, त्याला इतरांहून जास्त प्रयत्न करावे लागतातच. या अंतिम आणि महत्त्वाच्या टप्प्यात वेगळा आणि जास्त अभ्यास कसा करता येईल? अभ्यासासाठी नवनव्या अभ्यासतंत्रांचा समावेश नक्कीच करता येईल. खरं तर परीक्षेच्या तयारीचा प्रत्येक दिवस हा विशेष न वाटता रोजच्यासारखाच वाटायला हवा. त्यासाठी वेळेचं नियोजन करणं, आरोग्याची काळजी घेणं आणि आत्मविश्वासाने स्वत:शीच स्पर्धा करणं अशा तीनही आघाडयांवर अधिक काम करावं लागेल. यातून जी तयारी होते,ती खरी अभ्यासाची तयारी.
यंदाची राज्यसेवा पूर्वपरीक्षा - रविवार, 5 एप्रिल 2015 रोजी राज्यातील 36 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. राज्यसेवा परीक्षा ही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेण्यात येते. यापकी पूर्वपरीक्षा ही चाळणी परीक्षा असून पूर्वपरीक्षेचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत धरले जात नाहीत. जे विद्यार्थी पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण होतात, त्यांनाच मुख्य परीक्षेसाठी संधी मिळते.
तुमच्या आयुष्याचं ध्येय काय हो? या प्रश्नाचं उत्तर पैसा मिळवणे, श्रीमंत होणे, एखाद्या क्षेत्रात यशस्वी होणे ही उत्तरं काहीशी बरोबर असली तरीही दुय्यम आहेत किंवा अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्याची साधनं आहेत असं मला वाटतं. आयुष्याच्या ध्येयाचं मोजमाप करता येऊ नये किंवा कोणत्याही मर्यादेच्या चौकटीत बसवू नये. `मला जगात माणुसकीचा प्रचार करायचाय' या ध्येय कल्पना खुल्या स्वरूपाच्या आहेत. अमर्याद संभावना यातून व्यक्त होऊ शकतात. असं एखादं ध्येय मनाशी पक्क केल्यानंतर ते साध्य करण्याचीसाधनं आपल्या आवडीनुसार निवडता येतात. उदाहरणार्थ `माझ्या आयुष्याचं ध्येय आहे जगातील जास्तीत जास्त लोकांचं आयुष्य बदलण्यात मदत करणे, माझी आवड लेखन आहे. निरनिराळ्या माध्यमातून सकारात्मक लेखन करून मी माझ्या आयुष्याचं ध्येय मरणोत्तर साध्य करू शकतो. हेच ध्येय एक चहावालासुद्धा बाळगू शकतो. ग्राहकाला चहा देताना फक्त एक हास्य आणि चार गोड शब्द त्या ग्राहकाचा मूड बदलवू शकतो. या पद्धतीने आपण आपल्या आवडीच्या व्यवसायाच्या साहाय्याने एक मोठं ध्येय निश्चित करून ते साध्य करू शकतो.
एम.पी.एस.सी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गैरप्रकारहोऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.
करिअरच्या मध्यावर म्हणजे पदवीच्या अभ्यासक्रमाची दोन वर्षे पूर्ण करत असताना अनेकांना आपण चुकीचा अभ्यासक्रम निवडला आहे असे वाटू लागते. `त्या' ऐवजी आपण `दुसरा' अभ्यासक्रम निवडायला हवा होता असा साक्षात्कार होतो. असं वाटण्याची कारणे कोणती?
आगामी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षेची तयारी करताना उजळणीला फार महत्त्व आहे. अनेक पुस्तके वाचण्यापेक्षा निवडक संदर्भग्रंथांचा सखोल अभ्यास करा. सर्वसाधारणपणे 50 मिनिटांच्या अभ्यासानंतर पाच मिनिटांचा ब्रेक घ्या. पुढचा घटक अभ्यासण्याआधी मागच्या घटकातील किती गोष्टी लक्षात राहिल्या याचे मनन करा. दिवसाअखेरीस आपण किती वाचले आणि त्यापैकी आपल्या किती लक्षात राहिले हे तपासून पाहा. प्रत्येक आठवडयाच्या शेवटी आणि प्रत्येक महिन्याअखेरीस आपण अभ्यासलेल्या प्रत्येक घटकाची उजळणी करा. परीक्षा जवळ आली असल्याने रोज किमान 50 ते 100 बहुपर्यायी शब्द सोडवण्याचा सराव करा. या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न सोडविण्याची पद्धत उपयुक्त आहे.
स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर त्यात नेमकी कोणती स्पर्धा परीक्षा आहे हे डोळ्यासमोर आणणं आवश्यक आहे. त्यानुसार आपल्याला हा अभ्यास करता येईल. येथे आपण एमपीएससी , युपीएससीच्या स्पर्धा परीक्षा असतात त्यासंदर्भात विवेचन करणार आहोत. त्यानुसार अभ्यासाचे टप्पे पुढीलप्रमाणे -
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|