लोकसेवा संघ आयोगाने नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वपरीक्षेमध्ये काही फेरबदल निश्चित केले आहेत. पूर्वपरीक्षेमधील कल चाचणी अर्थात सीसॅटच्या पेपरमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमागची पाश्र्वभूमी अनेकांना माहीत असेलच. इंग्रजी भाषेच्या काठिण्याबाबत आणि त्रुटी असलेल्या भाषांतराबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांमधून, विविध मागण्यांमधून हे बदल करण्याचे आयोगाने ठरवले आहे.
यंदाची राज्यसेवा पूर्वपरीक्षा - रविवार, 5 एप्रिल 2015 रोजी राज्यातील 36 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. राज्यसेवा परीक्षा ही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेण्यात येते. यापकी पूर्वपरीक्षा ही चाळणी परीक्षा असून पूर्वपरीक्षेचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत धरले जात नाहीत. जे विद्यार्थी पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण होतात, त्यांनाच मुख्य परीक्षेसाठी संधी मिळते.
तुमच्या आयुष्याचं ध्येय काय हो? या प्रश्नाचं उत्तर पैसा मिळवणे, श्रीमंत होणे, एखाद्या क्षेत्रात यशस्वी होणे ही उत्तरं काहीशी बरोबर असली तरीही दुय्यम आहेत किंवा अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्याची साधनं आहेत असं मला वाटतं. आयुष्याच्या ध्येयाचं मोजमाप करता येऊ नये किंवा कोणत्याही मर्यादेच्या चौकटीत बसवू नये. `मला जगात माणुसकीचा प्रचार करायचाय' या ध्येय कल्पना खुल्या स्वरूपाच्या आहेत. अमर्याद संभावना यातून व्यक्त होऊ शकतात. असं एखादं ध्येय मनाशी पक्क केल्यानंतर ते साध्य करण्याचीसाधनं आपल्या आवडीनुसार निवडता येतात. उदाहरणार्थ `माझ्या आयुष्याचं ध्येय आहे जगातील जास्तीत जास्त लोकांचं आयुष्य बदलण्यात मदत करणे, माझी आवड लेखन आहे. निरनिराळ्या माध्यमातून सकारात्मक लेखन करून मी माझ्या आयुष्याचं ध्येय मरणोत्तर साध्य करू शकतो. हेच ध्येय एक चहावालासुद्धा बाळगू शकतो. ग्राहकाला चहा देताना फक्त एक हास्य आणि चार गोड शब्द त्या ग्राहकाचा मूड बदलवू शकतो. या पद्धतीने आपण आपल्या आवडीच्या व्यवसायाच्या साहाय्याने एक मोठं ध्येय निश्चित करून ते साध्य करू शकतो.
एम.पी.एस.सी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गैरप्रकारहोऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.
करिअरच्या मध्यावर म्हणजे पदवीच्या अभ्यासक्रमाची दोन वर्षे पूर्ण करत असताना अनेकांना आपण चुकीचा अभ्यासक्रम निवडला आहे असे वाटू लागते. `त्या' ऐवजी आपण `दुसरा' अभ्यासक्रम निवडायला हवा होता असा साक्षात्कार होतो. असं वाटण्याची कारणे कोणती?
स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर त्यात नेमकी कोणती स्पर्धा परीक्षा आहे हे डोळ्यासमोर आणणं आवश्यक आहे. त्यानुसार आपल्याला हा अभ्यास करता येईल. येथे आपण एमपीएससी , युपीएससीच्या स्पर्धा परीक्षा असतात त्यासंदर्भात विवेचन करणार आहोत. त्यानुसार अभ्यासाचे टप्पे पुढीलप्रमाणे -
चांगल्या कंपनीत चांगली नोकरी मिळविण्यासाठीसुद्धा वयोमर्यादा निश्चित केलेली असते. वय झाल्यावर कोणीही नोकरी देत नाही. वय संपल्यावर कोणीही विचारत नाही. त्यामुळे योग्य वयात शिक्षण पूर्ण करणे, करिअर करणे किंवा विविध प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षा देणे, स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करणे, भरपूर अभ्यास व मेहनत करणे अत्यंत आवश्यक आहे. एकंदरीत करिअरचे नियोजन `टाइम मॅनेजमेंट`चा आधार घेऊन करणं, काळाची गरज आहे.
स्पर्धा परीक्षांची सवय नसल्यामुळे गेल्या वर्षीची परीक्षा अवघड गेल्याचा अनेकांचा अनुभव असेल. त्यासाठी बहुपर्यायी प्रश्न सोडवण्याची सवय हवी. अनेक वेळा उत्तर माहीत असते पण ते नेमक्या वेळी आठवत नाही, असाही अनेकांचा अनुभव असेल. प्रश्न पाहणे, पर्याय पाहणे आणि त्यातून नेमके उत्तर सुचणे ही मेंदूची प्रतिक्षिप्त क्रिया असली पाहिजे. त्यासाठी वेळेचे नियोजन करून प्रश्न सोडवण्याचा सराव आवश्यक आहे.
5 नोव्हेंबर 2014 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विक्रीकर विभागातील विक्रीकर निरीक्षक `गट ब' या संवर्गातील एकूण 445 पदांच्या भरतीकरता अधिसूचना जारी केली. ही परीक्षा 1 फेब्रुवारी 2015 रोजी राज्याच्या 36 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमात सामान्य अध्ययन या घटकाअंतर्गत `भारतीय अर्थव्यवस्था' हा महत्त्वाचा घटक समाविष्ट करण्यात आला आहे.
यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्राचा अभ्यास करताना सुरुवातीला मुख्य आर्थिक संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. अलीकडच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर लक्षात येते की, अर्थशास्त्रावर बेतलेले प्रश्न हे संकल्पनांवर आधारित असतात. काही आकडेवारी लक्षात ठेवावी लागते अथवा ती पाठ केल्याशिवाय पर्याय नसतो, उदा. जनगणनेसंबंधित आकडेवारी, आयातनिर्यातसंबंधित आकडेवारी. भारतीय सैन्यदलात भरती होऊन देशासाठी थोडीफार सेवा करण्याची इच्छा अनेकांना असते. परंतु, काही अडचणींमुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे सगळ्यांनाच ही संधी मिळते असे नाही. संरक्षण क्षेत्रात करिअर घडवायचे असेल तर भरपूर संयम आवश्यक असतो. म्हणूनच या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणा-यांची संख्याही तुलनेने कमी असते. यामागे वेगवेगळी कारणेही असू शकतात. कारण कुठलेही असले तरीही वर्षातून काही आठवडेच सैन्यात अधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर अशांसाठी लेफ्टनंट होण्याची संधी नक्कीच उपलब्ध आहे. भारतीय सैन्यात सैन्य अधिका-यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. अशा परिस्थितीत ही सेवा देशाला नक्कीच उपयोगाची ठरू शकेल. लष्करातील करिअरची ही वेगळी वाट जाणून सैन्यदलात लेफ्टनंट होता येऊ शकते. हा अभ्यासक्रम असणा-या प्रादेशिक सैन्यदलाचे मुख्य कार्यालय पुण्यातील घोरपडी येथे आहे.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|