माणूस हा सामाजिक प्राणी आहे. खूप काळ एकांतवासात राहायला लागले, तर आपला मानसिक तोल ढासळू लागतो, हे अनेक शोधांद्वारे सिद्ध झालेले आहे. असे असतानाही अनेकांना इतरांशी संवाद साधणे कठीण जाते.
शिक्षण पद्धतींमध्ये झालेल्या बदलांप्रमाणे डिस्टन्सएज्युकेशन म्हणजेच दूरस्थ शिक्षण हा एक नवीन मार्ग म्हणता येईल. शिक्षण घेऊ इच्छिणाNयांसाठी एक नवीन पर्याय आहे असेही म्हणता येईल. या डिस्टन्स एज्युकेशनमुळे जॉब करून शिकू पाहणा-या किंवा एका शाखेतून दुस-या शाखेत शिकू इच्छिणा-यांसाठी ज्ञानाचे एक नवीन कवाड खुले झाले आहे किंवा शिक्षण अर्धवट झालेल्यांसाठी देखील हि सुवर्णसंधी आहे.
शासकीय नोकरीत आपले करिअर करू इच्छिणा-या युवावर्गासाठी बँक क्षेत्र हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. यंदाचा बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी प्रवर्गातील भरती प्रक्रियेचा कल लक्षात घेतल्यास- आय.बी.पी.एस., स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत 2014-15 वर्षांत सुमारे 90 हजार अधिकारी व कर्मचारी पदे भरण्यात येणार असल्याचे स्पष्ट होते. या पर्वणीचा लाभ बारावी व पदवीधर विद्याथ्र्यांनी करून घ्यायला हवा. विविध इन्स्टिटयूटद्वारे घेतल्या जाणाया बँकिंग, क्लार्क, पी.ओ., स्केल-वन, स्केल-टू व स्केल-थ्री, ग्रुप- ए अधिकारीवर्गाच्या परीक्षा तसेच ग्रुप- बीच्या
परीक्षा, लिपिक पदाच्या परीक्षा, ग्रामीण क्षेत्रीय बँकांसाठी लागणार्या विविध पदांसाठी घेतल्या जाणार्या परीक्षांची माहिती देत आहोत - सध्याच्या जागतिकीकरणाच्या दिवसांत व्यापार मोठया प्रमाणात वाढीस लागला आहे. जगभरातील मोठमोठया कंपन्या भारतात येत आहेत, तर भारतातील कंपन्या आपला विस्तार देशात आणि देशाबाहेर करीत आहेत. या अवाढव्य कंपन्यांचा डोलारा सांभाळायला कुशल व्यावसायिक आणि तज्ज्ञांची गरज असते. सर्वसाधारणपणे कंपनी म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर केवळ मॅनेजमेंट उभी राहते. यात व्यवस्थापनाची पदवी घेतलेल्या व्यक्तींचा समावेश असतो. पण कंपनीची कायदेशीर बाजू सांभाळण्याचे आव्हानात्मक काम `कंपनी सेक्रेटरी' ही व्यक्ती करीत असते.
मुख्य परीक्षेत निबंध अनिवार्य असतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तो विषयाला अनुसरून, मुद्देसूद, विविध चर्चाचा ऊहापोह केलेला असावा. मुख्य म्हणजे त्यात स्वत:ला अधोरेखित करावं. वर्तमानाचं भान ठेवून सुवाच्च अक्षरात निबंध लिहिला तर नक्कीच चांगले गुण मिळतील. मात्र त्यासाठी कसा सराव करणं आवश्यक आहे, याबाबतची थोडक्यात माहिती राज्यसेवा मुख्य परीक्षेत 800 गुणांपैकी 200 गुण - वर्णनात्मक मराठी आणि 100 गुण इंग्रजी असं स्वरूप आहे. या वर्णनात्मक स्वरूपाच्या उत्तरांना नकारात्मक गुणपद्धती नाही. त्यामुळे गुण मिळवण्यासाठी मराठी एक चांगला विषय आहे. परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये मराठी विषयाचा पहिला पेपर असतो. तोच जर चांगला लिहिला गेला तर `चांगली सुरुवात अर्धे अधिक काम जिंकून देते' याचा प्रत्यय येतोच.
नवीन नोकरीत न चुकणारी एक गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू. रंजनच्या मते, त्याला एखाद्याच्या समोर बसून उत्तरे कशी द्यायची हेच जमत नाही आणि आपण दिलेलं उत्तर बरोबर आहे का? योग्य शब्द वापरले आहेत का? आपल्याकडून नक्की काय अपेक्षित आहे, याचा अंदाजच येत नाही. अर्थात, रंजन असा एकटाच नाही. त्याच्यासारखे प्रश्न असलेले आणि दोलायमान मनस्थिती असलेले अनेक असतात. तसं पाहायला गेलं, तर बहुतांश इंटरव्ह्यूमध्ये ठराविक प्रकारचेच प्रश्न विचारले जातात. आपल्याला हे माहीत असूनही उत्तरांची तयारी केली जात नाही.
परीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम पुस्तकाचे परिणामकारक वाचन होणे आवश्यक आहे. एक गुणाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करताना प्रत्येक पाठातील महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करायला हवी. उदाहरणार्थ, `के 2' हे भारतातील सर्वांत उंच शिखर आहे. किबिथू हे भारताचे पूर्वेकडील परमस्थान आहे. बिकानेर ही आशिया खंडातील सर्वांत मोठी लोकर बाजारपेठ आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न केवळ स्वाध्यायांपुरते मर्यादित नाहीत, तर पाठ्यपुस्तकातील कोणत्याही भागातून विचारले जाऊ शकतात. प्रत्येक पाठात चौकटीत जी माहिती दिलेली आहे, त्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात.
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खालील यशाच्या 8 पाय-या
विद्याथ्र्यांना करिअरसाठी कशा प्रभावशाली ठरू शकतात ते पाहा. 1) शुभस्य शीघ्रम कोणत्याही आव्हानाला सामोरे जायचे असेल तर तुमची सुरुवात चांगली, सशक्त असली पाहिजे. या काळात इंग्रजीकडे विशेष लक्ष द्यावे. शिकत असताना बातम्या पाहणे व वाचणे महत्त्वाचे आहे. देश-विदेशातील घडामोडी, या घटनांचे होणारे परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये अशा विषयांमधून उमेदवारांचे सर्वंकष ज्ञान तपासले जाते, `शॉर्टकट' किंवा `फास्ट फॉरवर्ड' अभ्यास करून मिळवता येत नाही. मग त्यावर उपाय काय? शाळा, कॉलेजात असल्यापासूनच स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहायला हवे. स्पर्धापरीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांच्या अंगी अशाच प्रकारे सकारात्मक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलत चालला आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षेची सखोल तयारी करून स्पध्रेत उतरत आहेत. या परीक्षेसाठी बसणार्या विद्यार्थ्यांची संख्या आणि जागेची संख्या यात कमालीची तफावत आहे. मात्र योग्य तयारीने व जिद्दीने स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उतरले तर यश हमखास आहे. राज्यसेवेची तयारी करताना विद्यार्थ्यांने संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचादेखील विचार करावा. कारण दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम एकमेकास पूरक आहे.
येत्या 5 जानेवारीला उपशिक्षणाधिकारी पदासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचा आराखडा आणि सुधारित अभ्यासक्रमांची माहिती देत या परीक्षेची तयारी कशी करावी, यासंबंधीचे मार्गदर्शन महाराष्ट्र
लोकसेवा आयोगाने अनेक परीक्षांच्या अभ्यासक्रमांत बदल केलेला आहे. त्यात उपशिक्षणाधिकारी गट- ब या परीक्षेचाही समावेश आहे. |
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|