यंदाच्या वर्षांच्या अंतिम परीक्षेपूर्वीचे आता हाती उरलेले दिवस म्हणजे परीक्षेच्या तयारीचा अंतिम टप्पाच म्हणावा लागेल. परीक्षेला बसलेल्या विद्याथ्र्यांचा अभ्यास तर सुमारे वर्षभर आधीपासूनच सुरू झालेला असतो. त्यामुळे परीक्षेच्या या अंतिम टप्प्यात केवळ सराव व्हायला हवा. यापुढच्या दिवसांत अभ्यास किती केला आणि कसा केला हे महत्त्वाचे ठरेल. अभ्यास करताना काही नाविन्यपूर्ण तंत्रं अवलंबणे क्रमप्राप्त आहे. कारण ज्याला इतरांहून जास्त आणि इतरांपेक्षा वेगळं असं मिळवायचं असतं, त्याला इतरांहून जास्त प्रयत्न करावे लागतातच. या अंतिम आणि महत्त्वाच्या टप्प्यात वेगळा आणि जास्त अभ्यास कसा करता येईल? अभ्यासासाठी नवनव्या अभ्यासतंत्रांचा समावेश नक्कीच करता येईल. खरं तर परीक्षेच्या तयारीचा प्रत्येक दिवस हा विशेष न वाटता रोजच्यासारखाच वाटायला हवा. त्यासाठी वेळेचं नियोजन करणं, आरोग्याची काळजी घेणं आणि आत्मविश्वासाने स्वत:शीच स्पर्धा करणं अशा तीनही आघाडयांवर अधिक काम करावं लागेल. यातून जी तयारी होते,ती खरी अभ्यासाची तयारी.
यंदाच्या वर्षांच्या अंतिम परीक्षेपूर्वीचे आता हाती उरलेले दिवस म्हणजे परीक्षेच्या तयारीचा अंतिम टप्पाच म्हणावा लागेल. परीक्षेला बसलेल्या विद्याथ्र्यांचा अभ्यास तर सुमारे वर्षभर आधीपासूनच सुरू झालेला असतो. त्यामुळे परीक्षेच्या या अंतिम टप्प्यात केवळ सराव व्हायला हवा. यापुढच्या दिवसांत अभ्यास किती केला आणि कसा केला हे महत्त्वाचे ठरेल. अभ्यास करताना काही नाविन्यपूर्ण तंत्रं अवलंबणे क्रमप्राप्त आहे. कारण ज्याला इतरांहून जास्त आणि इतरांपेक्षा वेगळं असं मिळवायचं असतं, त्याला इतरांहून जास्त प्रयत्न करावे लागतातच. या अंतिम आणि महत्त्वाच्या टप्प्यात वेगळा आणि जास्त अभ्यास कसा करता येईल? अभ्यासासाठी नवनव्या अभ्यासतंत्रांचा समावेश नक्कीच करता येईल. खरं तर परीक्षेच्या तयारीचा प्रत्येक दिवस हा विशेष न वाटता रोजच्यासारखाच वाटायला हवा. त्यासाठी वेळेचं नियोजन करणं, आरोग्याची काळजी घेणं आणि आत्मविश्वासाने स्वत:शीच स्पर्धा करणं अशा तीनही आघाडयांवर अधिक काम करावं लागेल. यातून जी तयारी होते,ती खरी अभ्यासाची तयारी. यंदाची राज्यसेवा पूर्वपरीक्षा - रविवार, 5 एप्रिल 2015 रोजी राज्यातील 36 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. राज्यसेवा परीक्षा ही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेण्यात येते. यापकी पूर्वपरीक्षा ही चाळणी परीक्षा असून पूर्वपरीक्षेचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत धरले जात नाहीत. जे विद्यार्थी पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण होतात, त्यांनाच मुख्य परीक्षेसाठी संधी मिळते.
तुमच्या आयुष्याचं ध्येय काय हो? या प्रश्नाचं उत्तर पैसा मिळवणे, श्रीमंत होणे, एखाद्या क्षेत्रात यशस्वी होणे ही उत्तरं काहीशी बरोबर असली तरीही दुय्यम आहेत किंवा अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्याची साधनं आहेत असं मला वाटतं. आयुष्याच्या ध्येयाचं मोजमाप करता येऊ नये किंवा कोणत्याही मर्यादेच्या चौकटीत बसवू नये. `मला जगात माणुसकीचा प्रचार करायचाय' या ध्येय कल्पना खुल्या स्वरूपाच्या आहेत. अमर्याद संभावना यातून व्यक्त होऊ शकतात. असं एखादं ध्येय मनाशी पक्क केल्यानंतर ते साध्य करण्याचीसाधनं आपल्या आवडीनुसार निवडता येतात. उदाहरणार्थ `माझ्या आयुष्याचं ध्येय आहे जगातील जास्तीत जास्त लोकांचं आयुष्य बदलण्यात मदत करणे, माझी आवड लेखन आहे. निरनिराळ्या माध्यमातून सकारात्मक लेखन करून मी माझ्या आयुष्याचं ध्येय मरणोत्तर साध्य करू शकतो. हेच ध्येय एक चहावालासुद्धा बाळगू शकतो. ग्राहकाला चहा देताना फक्त एक हास्य आणि चार गोड शब्द त्या ग्राहकाचा मूड बदलवू शकतो. या पद्धतीने आपण आपल्या आवडीच्या व्यवसायाच्या साहाय्याने एक मोठं ध्येय निश्चित करून ते साध्य करू शकतो.
एम.पी.एस.सी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गैरप्रकारहोऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.
करिअरच्या मध्यावर म्हणजे पदवीच्या अभ्यासक्रमाची दोन वर्षे पूर्ण करत असताना अनेकांना आपण चुकीचा अभ्यासक्रम निवडला आहे असे वाटू लागते. `त्या' ऐवजी आपण `दुसरा' अभ्यासक्रम निवडायला हवा होता असा साक्षात्कार होतो. असं वाटण्याची कारणे कोणती?
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|