राज्य सेवा पूर्वपरीक्षा झाली. पेपर काहींना ठीक गेला असेल, काहींना अवघड, तर काहींना ब-यापकी चांगला. पेपर संपला तरी सहसा तो उमेदवारांची पाठ सोडत नाही. येथून पुढचे काही दिवस उत्तरतालिकेची वाट पाहण्यात, बरोबर किंवा चूक उत्तरांची संख्या शोधण्यात उमेदवारांचा वेळ जाईल. असे होणे स्वाभाविक असते. पूर्वपरीक्षेनंतरचा हा `शून्य काळ' अंदाज बांधण्यात खर्ची पडतो. तज्ज्ञ असे सुचवतात की, पूर्वपरीक्षेसाठी झोकून अभ्यास केला असेल तर पुढच्या तयारीला सज्ज होण्यापूर्वी दोन दिवसांचा आराम या शून्य काळात जरूर करावा. उत्तरे चूक की बरोबर हे शोधण्यात वेळ घालवू नका, असे कितीदा लिहिले-वाचले आणि ते पटले तरीही आपण स्वत:ला त्यापासून रोखू शकत नाही. निकालाची चिंता आणि उत्सुकता असणे स्वाभाविक आहे; पण एकदा पेपर संपला की, आपल्या हाती फक्त पुढच्या अभ्यासाचे नियोजन करणे आणि प्रत्यक्ष अभ्यास करणे एवढेच असते. पूर्वपरीक्षा आपण नक्की उत्तीर्ण होऊ असा काहींचा अंदाज असेल. काहींना आपण अपयशी ठरू असं वाटत असेल तर काही द्विधा मन-स्थितीत, संभ्रमात असतील; पण या सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकच समान योजना असेल. सर्वानी आपण मुख्य परीक्षा देणार आहोत असे गृहीत धरून पुढील अभ्यासाचे नियोजन करून अभ्यास सुरू करायला हवा.
लोकसेवा संघ आयोगाने नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वपरीक्षेमध्ये काही फेरबदल निश्चित केले आहेत. पूर्वपरीक्षेमधील कल चाचणी अर्थात सीसॅटच्या पेपरमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमागची पाश्र्वभूमी अनेकांना माहीत असेलच. इंग्रजी भाषेच्या काठिण्याबाबत आणि त्रुटी असलेल्या भाषांतराबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांमधून, विविध मागण्यांमधून हे बदल करण्याचे आयोगाने ठरवले आहे.
नागरी सेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी वृत्तपत्रांचा अभ्यास अनिवार्य ठरतो. सर्वसाधारणपणे 30 ते 40 टक्के तर कधी कधी यापेक्षा अधिक वस्तुनिष्ठ प्रश्न वर्तमान घडामोडींवर विचारले जातात. मुख्य परीक्षेतील इतिहास, कला व संस्कृती घटक वगळता सामान्य अध्ययनाच्या पहिल्या तिन्ही पेपरमधील सर्व घटकांवरील प्रश्न, तसेच 125 गुणांचा एक निबंध वर्तमान घडामोडींवरच बेतलेला असतो. बहुतांश वेळा व्यक्तिमत्त्व चाचणीमध्ये वर्तमान घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. थोडक्यात नागरी सेवा परीक्षेच्या तिन्ही टप्प्यांवर वृत्तपत्रांचे वाचन अपरिहार्य बनते.
यंदाच्या वर्षांच्या अंतिम परीक्षेपूर्वीचे आता हाती उरलेले दिवस म्हणजे परीक्षेच्या तयारीचा अंतिम टप्पाच म्हणावा लागेल. परीक्षेला बसलेल्या विद्याथ्र्यांचा अभ्यास तर सुमारे वर्षभर आधीपासूनच सुरू झालेला असतो. त्यामुळे परीक्षेच्या या अंतिम टप्प्यात केवळ सराव व्हायला हवा. यापुढच्या दिवसांत अभ्यास किती केला आणि कसा केला हे महत्त्वाचे ठरेल. अभ्यास करताना काही नाविन्यपूर्ण तंत्रं अवलंबणे क्रमप्राप्त आहे. कारण ज्याला इतरांहून जास्त आणि इतरांपेक्षा वेगळं असं मिळवायचं असतं, त्याला इतरांहून जास्त प्रयत्न करावे लागतातच. या अंतिम आणि महत्त्वाच्या टप्प्यात वेगळा आणि जास्त अभ्यास कसा करता येईल? अभ्यासासाठी नवनव्या अभ्यासतंत्रांचा समावेश नक्कीच करता येईल. खरं तर परीक्षेच्या तयारीचा प्रत्येक दिवस हा विशेष न वाटता रोजच्यासारखाच वाटायला हवा. त्यासाठी वेळेचं नियोजन करणं, आरोग्याची काळजी घेणं आणि आत्मविश्वासाने स्वत:शीच स्पर्धा करणं अशा तीनही आघाडयांवर अधिक काम करावं लागेल. यातून जी तयारी होते,ती खरी अभ्यासाची तयारी.
यंदाची राज्यसेवा पूर्वपरीक्षा - रविवार, 5 एप्रिल 2015 रोजी राज्यातील 36 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. राज्यसेवा परीक्षा ही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेण्यात येते. यापकी पूर्वपरीक्षा ही चाळणी परीक्षा असून पूर्वपरीक्षेचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत धरले जात नाहीत. जे विद्यार्थी पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण होतात, त्यांनाच मुख्य परीक्षेसाठी संधी मिळते.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|