शासनाचे विविध विभाग उदा. विक्रीकर, पोलीस इ. विभागात उमेदवारांची निकड भासते, त्या वेळी आयोग विक्रीकर निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक व मंत्रालय सहायक अशा पदांसाठी परीक्षा घेते. अगदी लिपिक या संवर्गासाठीसुद्धा आयोग परीक्षा घेते.
वस्तुतः केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही सुरुवातीपासूनच विद्याथ्र्यांचा कस पाहाणारी सर्वसमावेशक आणि आव्हानात्मक परीक्षा मानली जाते. या सेवेचा जगातील फ्रेंच नागरी सेवा परीक्षेपाठोपाठ कठीण परीक्षा म्हणून लौकिक आहे. केंद्र लोक आयोगाने या परीक्षांचे निःष्पक्ष, पारदर्शी आणि कार्यक्षमपणे आयोजन करून स्वच्छ कारभाराचा पायंडा रूढ केला आहे.
मुलाखत हा केंद्र लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतील शेवटचा आणि महत्त्वपूर्ण टप्पा असतो. उमेदवाराचे अंतिम यादीतील स्थान निश्चित करण्यात हा टप्पा निर्णायक ठरू शकतो. म्हणूनच यात जास्तीत जास्त गुण मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवणे अत्यावश्यक आहे. यूपीएससीने २७५ गुणांसाठी तर एमपीएससीने १०० गुणांसाठी मुलाखतीचा अंतिम टप्पा निर्धारित केलेला आहे. लोकसेवा आयोगाने मुलाखतीस व्यक्तिमत्त्व चाचणी असे संबोधले आहे. मुलाखतीचा हेतू उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व सनदी सेवा पदासाठी सक्षम आहे किंवा नाही याची तपासणी करणे होय.
यश प्रत्येकालाच हवं असतं, पण ते मिळवण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणंदेखील आवश्यक असतं. बरेचदा प्रयत्न करूनही यश पदरात पडत नाही. अशा वेळी पदरी निराशा येऊ शकते. पण त्यावेळी आपण केलेल्या चुकांचं निरीक्षण करून त्या चुका पुन्हा न करता अचूकपणे मार्गक्रमण केल्यास यशाची पायरी नक्कीच चढता येऊ शकते. यश मिळवण्यासाठी कुठलेही प्रयत्न करताना काही महत्त्वाच्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|