लोकसेवा संघ आयोगाने नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वपरीक्षेमध्ये काही फेरबदल निश्चित केले आहेत. पूर्वपरीक्षेमधील कल चाचणी अर्थात सीसॅटच्या पेपरमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमागची पाश्र्वभूमी अनेकांना माहीत असेलच. इंग्रजी भाषेच्या काठिण्याबाबत आणि त्रुटी असलेल्या भाषांतराबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांमधून, विविध मागण्यांमधून हे बदल करण्याचे आयोगाने ठरवले आहे.
तुमच्या आयुष्याचं ध्येय काय हो? या प्रश्नाचं उत्तर पैसा मिळवणे, श्रीमंत होणे, एखाद्या क्षेत्रात यशस्वी होणे ही उत्तरं काहीशी बरोबर असली तरीही दुय्यम आहेत किंवा अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्याची साधनं आहेत असं मला वाटतं. आयुष्याच्या ध्येयाचं मोजमाप करता येऊ नये किंवा कोणत्याही मर्यादेच्या चौकटीत बसवू नये. `मला जगात माणुसकीचा प्रचार करायचाय' या ध्येय कल्पना खुल्या स्वरूपाच्या आहेत. अमर्याद संभावना यातून व्यक्त होऊ शकतात. असं एखादं ध्येय मनाशी पक्क केल्यानंतर ते साध्य करण्याचीसाधनं आपल्या आवडीनुसार निवडता येतात. उदाहरणार्थ `माझ्या आयुष्याचं ध्येय आहे जगातील जास्तीत जास्त लोकांचं आयुष्य बदलण्यात मदत करणे, माझी आवड लेखन आहे. निरनिराळ्या माध्यमातून सकारात्मक लेखन करून मी माझ्या आयुष्याचं ध्येय मरणोत्तर साध्य करू शकतो. हेच ध्येय एक चहावालासुद्धा बाळगू शकतो. ग्राहकाला चहा देताना फक्त एक हास्य आणि चार गोड शब्द त्या ग्राहकाचा मूड बदलवू शकतो. या पद्धतीने आपण आपल्या आवडीच्या व्यवसायाच्या साहाय्याने एक मोठं ध्येय निश्चित करून ते साध्य करू शकतो.
करिअरच्या मध्यावर म्हणजे पदवीच्या अभ्यासक्रमाची दोन वर्षे पूर्ण करत असताना अनेकांना आपण चुकीचा अभ्यासक्रम निवडला आहे असे वाटू लागते. `त्या' ऐवजी आपण `दुसरा' अभ्यासक्रम निवडायला हवा होता असा साक्षात्कार होतो. असं वाटण्याची कारणे कोणती?
चांगल्या कंपनीत चांगली नोकरी मिळविण्यासाठीसुद्धा वयोमर्यादा निश्चित केलेली असते. वय झाल्यावर कोणीही नोकरी देत नाही. वय संपल्यावर कोणीही विचारत नाही. त्यामुळे योग्य वयात शिक्षण पूर्ण करणे, करिअर करणे किंवा विविध प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षा देणे, स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करणे, भरपूर अभ्यास व मेहनत करणे अत्यंत आवश्यक आहे. एकंदरीत करिअरचे नियोजन `टाइम मॅनेजमेंट`चा आधार घेऊन करणं, काळाची गरज आहे.
5 नोव्हेंबर 2014 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विक्रीकर विभागातील विक्रीकर निरीक्षक `गट ब' या संवर्गातील एकूण 445 पदांच्या भरतीकरता अधिसूचना जारी केली. ही परीक्षा 1 फेब्रुवारी 2015 रोजी राज्याच्या 36 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमात सामान्य अध्ययन या घटकाअंतर्गत `भारतीय अर्थव्यवस्था' हा महत्त्वाचा घटक समाविष्ट करण्यात आला आहे.
यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्राचा अभ्यास करताना सुरुवातीला मुख्य आर्थिक संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. अलीकडच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर लक्षात येते की, अर्थशास्त्रावर बेतलेले प्रश्न हे संकल्पनांवर आधारित असतात. काही आकडेवारी लक्षात ठेवावी लागते अथवा ती पाठ केल्याशिवाय पर्याय नसतो, उदा. जनगणनेसंबंधित आकडेवारी, आयातनिर्यातसंबंधित आकडेवारी. भारतीय सैन्यदलात भरती होऊन देशासाठी थोडीफार सेवा करण्याची इच्छा अनेकांना असते. परंतु, काही अडचणींमुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे सगळ्यांनाच ही संधी मिळते असे नाही. संरक्षण क्षेत्रात करिअर घडवायचे असेल तर भरपूर संयम आवश्यक असतो. म्हणूनच या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणा-यांची संख्याही तुलनेने कमी असते. यामागे वेगवेगळी कारणेही असू शकतात. कारण कुठलेही असले तरीही वर्षातून काही आठवडेच सैन्यात अधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर अशांसाठी लेफ्टनंट होण्याची संधी नक्कीच उपलब्ध आहे. भारतीय सैन्यात सैन्य अधिका-यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. अशा परिस्थितीत ही सेवा देशाला नक्कीच उपयोगाची ठरू शकेल. लष्करातील करिअरची ही वेगळी वाट जाणून सैन्यदलात लेफ्टनंट होता येऊ शकते. हा अभ्यासक्रम असणा-या प्रादेशिक सैन्यदलाचे मुख्य कार्यालय पुण्यातील घोरपडी येथे आहे.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. खूप काळ एकांतवासात राहायला लागले, तर आपला मानसिक तोल ढासळू लागतो, हे अनेक शोधांद्वारे सिद्ध झालेले आहे. असे असतानाही अनेकांना इतरांशी संवाद साधणे कठीण जाते.
शासकीय नोकरीत आपले करिअर करू इच्छिणा-या युवावर्गासाठी बँक क्षेत्र हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. यंदाचा बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी प्रवर्गातील भरती प्रक्रियेचा कल लक्षात घेतल्यास- आय.बी.पी.एस., स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत 2014-15 वर्षांत सुमारे 90 हजार अधिकारी व कर्मचारी पदे भरण्यात येणार असल्याचे स्पष्ट होते. या पर्वणीचा लाभ बारावी व पदवीधर विद्याथ्र्यांनी करून घ्यायला हवा. विविध इन्स्टिटयूटद्वारे घेतल्या जाणाया बँकिंग, क्लार्क, पी.ओ., स्केल-वन, स्केल-टू व स्केल-थ्री, ग्रुप- ए अधिकारीवर्गाच्या परीक्षा तसेच ग्रुप- बीच्या
परीक्षा, लिपिक पदाच्या परीक्षा, ग्रामीण क्षेत्रीय बँकांसाठी लागणार्या विविध पदांसाठी घेतल्या जाणार्या परीक्षांची माहिती देत आहोत - मुख्य परीक्षेत निबंध अनिवार्य असतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तो विषयाला अनुसरून, मुद्देसूद, विविध चर्चाचा ऊहापोह केलेला असावा. मुख्य म्हणजे त्यात स्वत:ला अधोरेखित करावं. वर्तमानाचं भान ठेवून सुवाच्च अक्षरात निबंध लिहिला तर नक्कीच चांगले गुण मिळतील. मात्र त्यासाठी कसा सराव करणं आवश्यक आहे, याबाबतची थोडक्यात माहिती राज्यसेवा मुख्य परीक्षेत 800 गुणांपैकी 200 गुण - वर्णनात्मक मराठी आणि 100 गुण इंग्रजी असं स्वरूप आहे. या वर्णनात्मक स्वरूपाच्या उत्तरांना नकारात्मक गुणपद्धती नाही. त्यामुळे गुण मिळवण्यासाठी मराठी एक चांगला विषय आहे. परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये मराठी विषयाचा पहिला पेपर असतो. तोच जर चांगला लिहिला गेला तर `चांगली सुरुवात अर्धे अधिक काम जिंकून देते' याचा प्रत्यय येतोच.
नवीन नोकरीत न चुकणारी एक गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू. रंजनच्या मते, त्याला एखाद्याच्या समोर बसून उत्तरे कशी द्यायची हेच जमत नाही आणि आपण दिलेलं उत्तर बरोबर आहे का? योग्य शब्द वापरले आहेत का? आपल्याकडून नक्की काय अपेक्षित आहे, याचा अंदाजच येत नाही. अर्थात, रंजन असा एकटाच नाही. त्याच्यासारखे प्रश्न असलेले आणि दोलायमान मनस्थिती असलेले अनेक असतात. तसं पाहायला गेलं, तर बहुतांश इंटरव्ह्यूमध्ये ठराविक प्रकारचेच प्रश्न विचारले जातात. आपल्याला हे माहीत असूनही उत्तरांची तयारी केली जात नाही.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|