प्रादेशिक सैन्यदलात भरतीची प्रक्रिया फारशी किचकट नाही. या सेनेची विविध कमांड्स दिल्ली, चंदिगड, कोलकाता, लखनऊ तसेच महाराष्ट्रात पुण्यातील घोरपडी येथे आहे. या कार्यालयात अर्ज दाखल करता येतो. वर्षातून दोनदा भरती प्रक्रिया होत असते. जानेवारी आणि जुलैमध्ये विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाते. दर वर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्याच्या साधारणपणे शेवटच्या रविवारी लेखी परीक्षा होते. ही लेखी परीक्षा 100 गुणांची असते. यापैकी 60 गुण सामान्य ज्ञान, राष्ट्र्रीय ,आंतरराष्ट्रrय घडामोडी यावरील आधारित प्रश्नांसाठी असतात. प्रश्न ऑब्जेक्टीव्ह असून प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय दिले जातात. उर्वरित 40 गुणांचा निबंध असतो. निबंध लेखनाचे विषय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींवर आधारित असतात. निबंधाचे एकूण चार विषय दिले जातात. त्यापैकी एका विषयावर 300 शब्दांपर्यंत निबंध लिहायचा असतो. या परीक्षेचा निकालदेखील त्वरीत म्हणजे दुस-या दिवशीच लागतो. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची पुढील दोन दिवसांत लगेच मौखिक चाचणी म्हणजेच इंटरव्हू घेण्यात येतो. या परीक्षेत जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना दोन महिन्यानंतर अलाहाबाद, भोपाळ, बंगळुरू, यापैकी एकाठिकाणहून एसएसबी या मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. ती मुलाखत पाच दिवसांची असते. या मुलाखतीत पात्र ठरलेल्या विद्याथ्र्याची वेद्यकीय चाचणी घेतली जाते. जे उमेदवार या चाचणीत पात्र ठरतात त्यांना पुढील तीन महिन्यात सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्त केले जाते. या नियुक्तीनंतर सैन्य अधिकारी म्हणून त्यांची वाटचाल सुरू होते. यानंतर उमेदवाराला डेहराडून येथील भारतीय प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रकारे मनात राहिलेली देशसेवेची सुप्त इच्छा आपण प्रादेशिक सैन्याद्वारे भरती होऊन पूर्ण करू शकतो. या नोकरीचा फायदा म्हणजे इच्छापूर्ती, देशसेवेची संधी, सरकारी नियमांप्रमाणे वेतन आणि सुविधा एवढे सगळे मिळून आपण आपला इतर व्यवसाय विंâवा नोकरीदेखील उर्वरित कालावधीत करू शकतो. मग ज्यांना वर्षातील काही आठवडे देशसेवेसाठी द्यायचे असतील त्यांनी त्वरीत तयार व्हावे आणि प्रादेशिक सैन्याच्या माध्यमातून ही संधी मिळवावी.
भारतीय सैन्यदलात भरती होऊन देशासाठी थोडीफार सेवा करण्याची इच्छा अनेकांना असते. परंतु, काही अडचणींमुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे सगळ्यांनाच ही संधी मिळते असे नाही. संरक्षण क्षेत्रात करिअर घडवायचे असेल तर भरपूर संयम आवश्यक असतो. म्हणूनच या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणा-यांची संख्याही तुलनेने कमी असते. यामागे वेगवेगळी कारणेही असू शकतात. कारण कुठलेही असले तरीही वर्षातून काही आठवडेच सैन्यात अधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर अशांसाठी लेफ्टनंट होण्याची संधी नक्कीच उपलब्ध आहे. भारतीय सैन्यात सैन्य अधिका-यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. अशा परिस्थितीत ही सेवा देशाला नक्कीच उपयोगाची ठरू शकेल. लष्करातील करिअरची ही वेगळी वाट जाणून सैन्यदलात लेफ्टनंट होता येऊ शकते. हा अभ्यासक्रम असणा-या प्रादेशिक सैन्यदलाचे मुख्य कार्यालय पुण्यातील घोरपडी येथे आहे. 9 ऑक्टोबर 1948 मध्ये भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी. गोपालचारी यांनी या दलाची स्थापना केली होती. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्ण केल्यानंतर आपण नियमित सैन्यदलाप्रमाणे काम करू शकतो. पण केवळ वर्षातून काही आठवड्यांसाठीच. हुद्दा, वेतन, सोयी-सुविधा, सवलती सर्व काही सैन्यदलातील अधिका-यांप्रमाणेच असते मात्र, त्या बदल्यात काही आठवडे आपण सैन्यदलाच्या एका तुकडीबरोबर रहायचे. वर्षाचे उर्वरित दिवस आपण दैनंदिन व्यवसाय, नोकरी जे असेल ते करू शकतो. अर्थातच ही संधी केवळ पुरुष उमेदवारांसाठीच आहे. ही संधी मिळण्यासाठी उत्तम ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच प्रादेशिक सेनेमध्ये सैन्य अधिकारी व्हायचे असेल तर कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा 18 ते 42 वर्षे आहे. तसेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उमेदवार सक्षम असणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाची अट म्हणजे कोणत्याही विहित सनदशील मार्गाने त्या उमेदवाराचे मासिक उत्पन्न कमीत कमी पाच ते सात हजार असणे गरजेचे आहे.
प्रादेशिक सैन्यदलात भरतीची प्रक्रिया फारशी किचकट नाही. या सेनेची विविध कमांड्स दिल्ली, चंदिगड, कोलकाता, लखनऊ तसेच महाराष्ट्रात पुण्यातील घोरपडी येथे आहे. या कार्यालयात अर्ज दाखल करता येतो. वर्षातून दोनदा भरती प्रक्रिया होत असते. जानेवारी आणि जुलैमध्ये विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाते. दर वर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्याच्या साधारणपणे शेवटच्या रविवारी लेखी परीक्षा होते. ही लेखी परीक्षा 100 गुणांची असते. यापैकी 60 गुण सामान्य ज्ञान, राष्ट्र्रीय ,आंतरराष्ट्रrय घडामोडी यावरील आधारित प्रश्नांसाठी असतात. प्रश्न ऑब्जेक्टीव्ह असून प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय दिले जातात. उर्वरित 40 गुणांचा निबंध असतो. निबंध लेखनाचे विषय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींवर आधारित असतात. निबंधाचे एकूण चार विषय दिले जातात. त्यापैकी एका विषयावर 300 शब्दांपर्यंत निबंध लिहायचा असतो. या परीक्षेचा निकालदेखील त्वरीत म्हणजे दुस-या दिवशीच लागतो. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची पुढील दोन दिवसांत लगेच मौखिक चाचणी म्हणजेच इंटरव्हू घेण्यात येतो. या परीक्षेत जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना दोन महिन्यानंतर अलाहाबाद, भोपाळ, बंगळुरू, यापैकी एकाठिकाणहून एसएसबी या मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. ती मुलाखत पाच दिवसांची असते. या मुलाखतीत पात्र ठरलेल्या विद्याथ्र्याची वेद्यकीय चाचणी घेतली जाते. जे उमेदवार या चाचणीत पात्र ठरतात त्यांना पुढील तीन महिन्यात सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्त केले जाते. या नियुक्तीनंतर सैन्य अधिकारी म्हणून त्यांची वाटचाल सुरू होते. यानंतर उमेदवाराला डेहराडून येथील भारतीय प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रकारे मनात राहिलेली देशसेवेची सुप्त इच्छा आपण प्रादेशिक सैन्याद्वारे भरती होऊन पूर्ण करू शकतो. या नोकरीचा फायदा म्हणजे इच्छापूर्ती, देशसेवेची संधी, सरकारी नियमांप्रमाणे वेतन आणि सुविधा एवढे सगळे मिळून आपण आपला इतर व्यवसाय विंâवा नोकरीदेखील उर्वरित कालावधीत करू शकतो. मग ज्यांना वर्षातील काही आठवडे देशसेवेसाठी द्यायचे असतील त्यांनी त्वरीत तयार व्हावे आणि प्रादेशिक सैन्याच्या माध्यमातून ही संधी मिळवावी. Comments are closed.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|