लोकसेवा संघ आयोगाने नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वपरीक्षेमध्ये काही फेरबदल निश्चित केले आहेत. पूर्वपरीक्षेमधील कल चाचणी अर्थात सीसॅटच्या पेपरमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमागची पाश्र्वभूमी अनेकांना माहीत असेलच. इंग्रजी भाषेच्या काठिण्याबाबत आणि त्रुटी असलेल्या भाषांतराबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांमधून, विविध मागण्यांमधून हे बदल करण्याचे आयोगाने ठरवले आहे.
तुमच्या आयुष्याचं ध्येय काय हो? या प्रश्नाचं उत्तर पैसा मिळवणे, श्रीमंत होणे, एखाद्या क्षेत्रात यशस्वी होणे ही उत्तरं काहीशी बरोबर असली तरीही दुय्यम आहेत किंवा अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्याची साधनं आहेत असं मला वाटतं. आयुष्याच्या ध्येयाचं मोजमाप करता येऊ नये किंवा कोणत्याही मर्यादेच्या चौकटीत बसवू नये. `मला जगात माणुसकीचा प्रचार करायचाय' या ध्येय कल्पना खुल्या स्वरूपाच्या आहेत. अमर्याद संभावना यातून व्यक्त होऊ शकतात. असं एखादं ध्येय मनाशी पक्क केल्यानंतर ते साध्य करण्याचीसाधनं आपल्या आवडीनुसार निवडता येतात. उदाहरणार्थ `माझ्या आयुष्याचं ध्येय आहे जगातील जास्तीत जास्त लोकांचं आयुष्य बदलण्यात मदत करणे, माझी आवड लेखन आहे. निरनिराळ्या माध्यमातून सकारात्मक लेखन करून मी माझ्या आयुष्याचं ध्येय मरणोत्तर साध्य करू शकतो. हेच ध्येय एक चहावालासुद्धा बाळगू शकतो. ग्राहकाला चहा देताना फक्त एक हास्य आणि चार गोड शब्द त्या ग्राहकाचा मूड बदलवू शकतो. या पद्धतीने आपण आपल्या आवडीच्या व्यवसायाच्या साहाय्याने एक मोठं ध्येय निश्चित करून ते साध्य करू शकतो.
करिअरच्या मध्यावर म्हणजे पदवीच्या अभ्यासक्रमाची दोन वर्षे पूर्ण करत असताना अनेकांना आपण चुकीचा अभ्यासक्रम निवडला आहे असे वाटू लागते. `त्या' ऐवजी आपण `दुसरा' अभ्यासक्रम निवडायला हवा होता असा साक्षात्कार होतो. असं वाटण्याची कारणे कोणती?
स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर त्यात नेमकी कोणती स्पर्धा परीक्षा आहे हे डोळ्यासमोर आणणं आवश्यक आहे. त्यानुसार आपल्याला हा अभ्यास करता येईल. येथे आपण एमपीएससी , युपीएससीच्या स्पर्धा परीक्षा असतात त्यासंदर्भात विवेचन करणार आहोत. त्यानुसार अभ्यासाचे टप्पे पुढीलप्रमाणे -
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. खूप काळ एकांतवासात राहायला लागले, तर आपला मानसिक तोल ढासळू लागतो, हे अनेक शोधांद्वारे सिद्ध झालेले आहे. असे असतानाही अनेकांना इतरांशी संवाद साधणे कठीण जाते.
सध्याच्या जागतिकीकरणाच्या दिवसांत व्यापार मोठया प्रमाणात वाढीस लागला आहे. जगभरातील मोठमोठया कंपन्या भारतात येत आहेत, तर भारतातील कंपन्या आपला विस्तार देशात आणि देशाबाहेर करीत आहेत. या अवाढव्य कंपन्यांचा डोलारा सांभाळायला कुशल व्यावसायिक आणि तज्ज्ञांची गरज असते. सर्वसाधारणपणे कंपनी म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर केवळ मॅनेजमेंट उभी राहते. यात व्यवस्थापनाची पदवी घेतलेल्या व्यक्तींचा समावेश असतो. पण कंपनीची कायदेशीर बाजू सांभाळण्याचे आव्हानात्मक काम `कंपनी सेक्रेटरी' ही व्यक्ती करीत असते.
मुख्य परीक्षेत निबंध अनिवार्य असतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तो विषयाला अनुसरून, मुद्देसूद, विविध चर्चाचा ऊहापोह केलेला असावा. मुख्य म्हणजे त्यात स्वत:ला अधोरेखित करावं. वर्तमानाचं भान ठेवून सुवाच्च अक्षरात निबंध लिहिला तर नक्कीच चांगले गुण मिळतील. मात्र त्यासाठी कसा सराव करणं आवश्यक आहे, याबाबतची थोडक्यात माहिती राज्यसेवा मुख्य परीक्षेत 800 गुणांपैकी 200 गुण - वर्णनात्मक मराठी आणि 100 गुण इंग्रजी असं स्वरूप आहे. या वर्णनात्मक स्वरूपाच्या उत्तरांना नकारात्मक गुणपद्धती नाही. त्यामुळे गुण मिळवण्यासाठी मराठी एक चांगला विषय आहे. परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये मराठी विषयाचा पहिला पेपर असतो. तोच जर चांगला लिहिला गेला तर `चांगली सुरुवात अर्धे अधिक काम जिंकून देते' याचा प्रत्यय येतोच.
नवीन नोकरीत न चुकणारी एक गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू. रंजनच्या मते, त्याला एखाद्याच्या समोर बसून उत्तरे कशी द्यायची हेच जमत नाही आणि आपण दिलेलं उत्तर बरोबर आहे का? योग्य शब्द वापरले आहेत का? आपल्याकडून नक्की काय अपेक्षित आहे, याचा अंदाजच येत नाही. अर्थात, रंजन असा एकटाच नाही. त्याच्यासारखे प्रश्न असलेले आणि दोलायमान मनस्थिती असलेले अनेक असतात. तसं पाहायला गेलं, तर बहुतांश इंटरव्ह्यूमध्ये ठराविक प्रकारचेच प्रश्न विचारले जातात. आपल्याला हे माहीत असूनही उत्तरांची तयारी केली जात नाही.
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खालील यशाच्या 8 पाय-या
विद्याथ्र्यांना करिअरसाठी कशा प्रभावशाली ठरू शकतात ते पाहा. 1) शुभस्य शीघ्रम कोणत्याही आव्हानाला सामोरे जायचे असेल तर तुमची सुरुवात चांगली, सशक्त असली पाहिजे. या काळात इंग्रजीकडे विशेष लक्ष द्यावे. शिकत असताना बातम्या पाहणे व वाचणे महत्त्वाचे आहे. देश-विदेशातील घडामोडी, या घटनांचे होणारे परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये अशा विषयांमधून उमेदवारांचे सर्वंकष ज्ञान तपासले जाते, `शॉर्टकट' किंवा `फास्ट फॉरवर्ड' अभ्यास करून मिळवता येत नाही. मग त्यावर उपाय काय? शाळा, कॉलेजात असल्यापासूनच स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहायला हवे. स्पर्धापरीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांच्या अंगी अशाच प्रकारे सकारात्मक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलत चालला आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षेची सखोल तयारी करून स्पध्रेत उतरत आहेत. या परीक्षेसाठी बसणार्या विद्यार्थ्यांची संख्या आणि जागेची संख्या यात कमालीची तफावत आहे. मात्र योग्य तयारीने व जिद्दीने स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उतरले तर यश हमखास आहे. राज्यसेवेची तयारी करताना विद्यार्थ्यांने संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचादेखील विचार करावा. कारण दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम एकमेकास पूरक आहे.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|