मुख्य परीक्षेत निबंध अनिवार्य असतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तो विषयाला अनुसरून, मुद्देसूद, विविध चर्चाचा ऊहापोह केलेला असावा. मुख्य म्हणजे त्यात स्वत:ला अधोरेखित करावं. वर्तमानाचं भान ठेवून सुवाच्च अक्षरात निबंध लिहिला तर नक्कीच चांगले गुण मिळतील. मात्र त्यासाठी कसा सराव करणं आवश्यक आहे, याबाबतची थोडक्यात माहिती राज्यसेवा मुख्य परीक्षेत 800 गुणांपैकी 200 गुण - वर्णनात्मक मराठी आणि 100 गुण इंग्रजी असं स्वरूप आहे. या वर्णनात्मक स्वरूपाच्या उत्तरांना नकारात्मक गुणपद्धती नाही. त्यामुळे गुण मिळवण्यासाठी मराठी एक चांगला विषय आहे. परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये मराठी विषयाचा पहिला पेपर असतो. तोच जर चांगला लिहिला गेला तर `चांगली सुरुवात अर्धे अधिक काम जिंकून देते' याचा प्रत्यय येतोच.
नवीन नोकरीत न चुकणारी एक गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू. रंजनच्या मते, त्याला एखाद्याच्या समोर बसून उत्तरे कशी द्यायची हेच जमत नाही आणि आपण दिलेलं उत्तर बरोबर आहे का? योग्य शब्द वापरले आहेत का? आपल्याकडून नक्की काय अपेक्षित आहे, याचा अंदाजच येत नाही. अर्थात, रंजन असा एकटाच नाही. त्याच्यासारखे प्रश्न असलेले आणि दोलायमान मनस्थिती असलेले अनेक असतात. तसं पाहायला गेलं, तर बहुतांश इंटरव्ह्यूमध्ये ठराविक प्रकारचेच प्रश्न विचारले जातात. आपल्याला हे माहीत असूनही उत्तरांची तयारी केली जात नाही.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|