कॉम्प्युटरमधील सर्व विद्यार्थ्याचा डाटा करप्ट झाल्याने पुढे ढकलण्यात आलेली एमपीएससीची परीक्षा पुन्हा एकदा घोळात सापडली आहे. १८ मे ला होणा-या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यानी मागणी केलेली परीक्षा केंद्रे न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य लोकसेवा आयोगामार्फत ७ एप्रिललाया परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु अचानक लोकसेवा आयोगाकडून परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्याचा डाटाच नाहीसा झाल्याने ही परीक्षा १८ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे निर्धास्त झालेले विद्यार्थी हॉल तिकिट हातात पडल्यानंतर मात्र पुन्हा गोंधळात पडले आहेत. नाशिकच्या अनेक विद्यार्थ्याना पुणे, मुंबई, अहमदनगर यासह राज्यातील अन्य शहरांमधील काही परीक्षा केंद्रे देण्यात आलेली आहेत. अर्ज भरताना नाशिक केंद्राची मागणी करुनही आयोगामार्फत ही चूक झाल्याचे संबंधित विद्यार्थ्यानी सांगितले. परीक्षेला केवळ दहा दिवस उरलेले असतानाच अचानकपणे केंद्र बदलल्याचे कळल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. याबाबत आयोगाशी संपर्क साधला असता हॉल तिकिटवर मिळालेल्या केंद्रावरच विद्यार्थ्यानी परीक्षा द्यावी लागेल असे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यानी केन्द्र बदलून देण्याची मागणी केली असता आयोगाने नकार दिला आहे . यापूर्वी आयोजित केलेल्या परीक्षेचा डाटा नाहीसा झाल्यामुळे संबंधित परीक्षा जवळपास दीड महिना पुढे ढकलण्यात आली होती. या कालावधीत विद्यार्थ्यानी पुन्हा हे अर्ज भरुन सर्व प्रक्रिया पार पाडली. तरीही आयोगामार्फत परीक्षा केंद्राच्याबाबतीत ढिसाळपणे नियोजन केल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक प्रशासनाचा तसंच नागरी सोयीसुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करते. प्रशिक्षित कर्मचारी आणि अधिकारी तसंच लोकप्रतिनिधी घडवण्यासाठी संस्थेने शैक्षणिक आणि प्रशिक्षण कार्य हाती घेतलं आहे. नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा वगैरे स्थानिक शासन संस्थांमधील कर्मचारी आणि या क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-या व्यक्तींसाठी संस्थेने अनेक व्यावसायाभिमुख कोर्सेस तयार केले आहेत. या कोसेर्सना युनिव्हसिर्टीची मान्यता आहे.
कोणत्याही अपयशाचे खापर फोडण्यासाठी.. एखादा दहशतवादी हल्ला झाला, अतिरेकी स्फोट घडविण्यात यशस्वी झाले, खोटे चलन बाजारपेठेत अवतरले, अमली पदार्थाची रेव्ह पार्टी यशस्वीपणे पार पडली किंवा अगदी एखाद्या प्रकरणाच्या तपासात अपयश आले की आपण भारतीय आपल्याच गुप्तचर खात्याला दोष देऊन मोकळे होतो. कारण गुप्तचर खात्याचे नेमके काम-जबाबदा-या काय आहेत, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसते; शिवाय त्याविषयी काही जाणून घ्यायचे कुतूहलही आपण फारसे दाखवत नाही.
खासगी क्षेत्रातल्या नोक-या कितीही वाढल्या असल्या आणि त्यातील भल्यामोठ्या पगाराचे आकडे चमकत असले तरी बँकेतल्या नोक-यांचं महत्त्व कमी झालेलं नाही. आजही बँकेच्या नोकरीविषयी आपल्या मध्ये आकर्षण कायम आहे. अणु उर्जा विभागातर्फे मुंबई व भुवनेश्वर येथे उपलब्ध असणा-या ५ वर्षीय एमएस्सी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणा-या नॅशनल एन्ट्रन्स स्क्रिनिंग टेस्ट एनईएसटी २०१३साठी प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. वाढत्या उद्योगांमध्ये कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात दुवा निर्माण करण्याचे काम इण्डस्ट्रिअल सायकॉलॉजिस्ट करतात. या इण्डस्ट्रीतील जागा पहाता सायकॉलॉजिस्टसाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत
मोठमोठी स्वप्नं अनेक जण बघतात, मात्र ती पूर्ण कशी करायची, हे आपल्याला नेमक समजत नाही.त्यातून नैराश्य येतं. नैराश्यामुळे कमकुवतपणा येतो आणि एकटेपणाची भावना निर्माण होते. कुठलंही काम आपण एकाग्रतेने करू शकत नाही. नोकरदार असू, तर नोकरीच्या ठिकाणी जाण्याचं मन होत नाही, मात्र ऑफिसला जाण्याशिवाय पर्यायही नसतो. अशा वेळी सर्वप्रथम मनाची मरगळ दूर करायला हवी तरच आपलं स्वप्न, ईप्सित गाठता येणं शक्य आहे.यासाठी काय करता येईल ते पाहूया. गुन्हे अन्वेषणाचं काम करण्याची अनेकांची इच्छा असते. सी.बी.आय.मध्ये जाण्यासाठी काय करावं, याबद्दल माहिती जाणून घेण्याची उत्कंठा आपल्या मध्ये असते.
सी.बी.आय.ची स्थापना १९६३ मध्ये झाली. प्रामुख्याने आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार, सरकारी नोकर व उच्चपदस्थांचा भ्रष्टाचार, दहशतवाद, बॉम्बस्फोट, माफिया, अंडरवल्र्ड आदी बाबींमध्ये तपास करण्याचं काम सी.बी.आय. करतं. सी.बी.आय.मध्ये विविध प्रकारे भरती केली जाते. सर्वसामान्य जनतेचं रक्षण करणारा, गुंडाराज-भ्रष्टाचार या विरोधात लढणारा आणि त्याचवेळी स्वतःच्या करियरचा ग्राफ उंचावणारा असा पोलीस अधिकारी समाजाला हवा असतो.
खलनिग्रहणाय सदरक्षणाय हे ब्रीदवाक्य जपणा-या कर्तव्यदक्ष पोलीस अधिका-याची आज समाजव्यवस्थेला नितांत गरज आहे. किरण बेदी, जे.एफ. रिबेरो यांच्यासारख्या पोलीस अधिका-यांनी स्वतःच्या करियरसोबतच समाजाचं ऋणही फेडलेलं आहे. पोलीस अधिकारी बनण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. अशाच काही करियर मार्गाची ओळख करून घेणार आहोत. पुर्वपरीक्षा हा या परीक्षेतील महत्त्वाचा टप्पा असतो. प्रत्येक उमेदवाराची मुख्य परीक्षा आणि मुलाखत घेणं शक्य नसल्याने या पूर्वपरीक्षेतून हुशार, सर्वगुणसंपन्न आणि सगळ्या क्षेत्राचं ज्ञान असलेल्या उमेदवाराला निवडलं जातं. या पूर्वपरीक्षेची माहिती करून घेऊया. या परीक्षेसाठी दोन पेपर असतात.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|