खलनिग्रहणाय सदरक्षणाय हे ब्रीदवाक्य जपणा-या कर्तव्यदक्ष पोलीस अधिका-याची आज समाजव्यवस्थेला नितांत गरज आहे. किरण बेदी, जे.एफ. रिबेरो यांच्यासारख्या पोलीस अधिका-यांनी स्वतःच्या करियरसोबतच समाजाचं ऋणही फेडलेलं आहे. पोलीस अधिकारी बनण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. अशाच काही करियर मार्गाची ओळख करून घेणार आहोत.
सर्वसामान्य जनतेचं रक्षण करणारा, गुंडाराज-भ्रष्टाचार या विरोधात लढणारा आणि त्याचवेळी स्वतःच्या करियरचा ग्राफ उंचावणारा असा पोलीस अधिकारी समाजाला हवा असतो.
खलनिग्रहणाय सदरक्षणाय हे ब्रीदवाक्य जपणा-या कर्तव्यदक्ष पोलीस अधिका-याची आज समाजव्यवस्थेला नितांत गरज आहे. किरण बेदी, जे.एफ. रिबेरो यांच्यासारख्या पोलीस अधिका-यांनी स्वतःच्या करियरसोबतच समाजाचं ऋणही फेडलेलं आहे. पोलीस अधिकारी बनण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. अशाच काही करियर मार्गाची ओळख करून घेणार आहोत. पुर्वपरीक्षा हा या परीक्षेतील महत्त्वाचा टप्पा असतो. प्रत्येक उमेदवाराची मुख्य परीक्षा आणि मुलाखत घेणं शक्य नसल्याने या पूर्वपरीक्षेतून हुशार, सर्वगुणसंपन्न आणि सगळ्या क्षेत्राचं ज्ञान असलेल्या उमेदवाराला निवडलं जातं. या पूर्वपरीक्षेची माहिती करून घेऊया. या परीक्षेसाठी दोन पेपर असतात.
नशनल एलिजिबिलिटी टेस्ट अर्थात नेटच्या स्वरूपात बदल होत आहे. यापूर्वी परीक्षेचा तिसरा पेपर दीर्घोत्तरी स्वरूपात घेतला जात असे. मात्र, यापुढील काळात तिस-या पेपरसह ही परीक्षा पूर्णपणे वस्तुनिष्ठ
करिअर टेस्ट तुम्ही कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी मार्गदर्शन करते. काही प्रश्नांच्या उत्तरातून तुम्ही एखादं करिअर निवडणं आहे की नाही, हे त्यातून समजतं. योग्य अशा करिअरची निवड म्हणजे आयुष्यात यश मिळण्याची खात्री असते. याचाच अर्थ आपलं संपूर्ण आयुष्य आनंदात घालवण्याची किल्ली तुमच्या करिअर निवडीमध्ये आहे. विशेष म्हणजे आता तर दहावीपासूनच आपण कोणत्या क्षेत्रात करिअर करावं, याविषयी आपलं स्पष्ट मत व्यक्त करायला लागले आहेत. अनेकदा आईवडिलांनी निर्णय घेतल्याप्रमाणे वाटचाल केली जाते. त्यामुळे पुढे जाऊन यश मिळेल याची खात्री नसते. शिवाय अनेकदा आपण निवडलेलं क्षेत्र न आवडणारं आहे, हे खूप उशीरा समजतं. त्यामुळेच करिअर कोणत्या क्षेत्रात करावं यासाठी करिअर टेस्ट हा पर्याय कदाचित मार्गदर्शक ठरू शकेल.
शैक्षणिक यश मिळविण्यासाठी अभ्यास किती वेळ करावा यापेक्षा अभ्यास कसा करावा हे अधिक महत्वाचे आहे. अभ्यासाचा मानसिक ताण निर्माण होऊ नये तसेच शिकलेल्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहाव्यात यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.अभ्यासाच्या चुकीच्या पद्धतीमुळे देखील अपयश येत असते. दिवसरात्र अभ्यास करणे महत्वाचे नसून एकाग्र चित्ताने आणि निग्रहाने अभ्यास करणे गरजेचे असते.
अझिम प्रेमजी विद्यापीठातर्फे शिक्षण व विकास विषयांतर्गत एम.ए. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २०१३-२०१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अलीकडे सिव्हील सव्र्हिसेस परीक्षेस बसणा-या मराठी भाषिक उमेदवारांची संख्या फार मोठया प्रमाणात वाढली आहे. सिव्हिल सव्र्हिसेस एक्झामिनेशन (नागरी सेवा परीक्षा) असे असून या परीक्षेद्वारे एकूण २८ प्रकारची विवध पदे भरली जातात. ही विविध पदे खालीलप्रमाणे आहेत.
राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कृषिविषयक घटकावर सर्व साधारणपणे ३० प्रश्न विचारले जातात.ह्या प्रश्नांची काठीण्यपातळी देखील मागील दोन -तीन वर्षात वाढलेली दिसून येते. कृषी घटकामध्ये आकडेवारीवर आधारित प्रश्नांची संख्या वाढली असून अत्यंत नेमकी , अचूक आणि अद्यावत माहिती संकलित करूनच ह्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.
पिक पद्धती , विविध पिके,पिकांचे वाण, पिकांच्या वाणांची उत्पादकता विविध पिकांचे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर हेक्टरी उत्पादन ह्या स्वरूपाचे प्रश्न पीकपद्धती ह्या उप घटकामध्ये विचारले जातात. त्याच बरोबर ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या संशोधनात्मक संस्थांच्या बाबत देखील प्रश्न विचारले जातात. मशागत तंत्र बाबतच्या पद्धती आणि त्या मध्ये आधुनिक सुधारणा ह्यांची तयारीदेखील फायदेशीर ठरते. पशुसंवर्धनाच्या बाबतीत विविध संकरीत जाती , त्यांची दुग्धोत्पादन क्षमता, कुक्कुट पालन ह्या बाबींची तयारी सुद्धा करणे आवश्यक आहे. फलोद्यान विकास , मत्स्य विकास , या संदर्भात सिद्ध सखोल तयारी करणे गरजेचे आहे.कृषी अर्थ व्यवस्था ह्या घटकावर संकल्पना बरोबरच आकडेवारीवर देखील प्रश्न विचारले जातात. आकडेवारीची तयारी करताना नेमकेपणाने आणि अद्यावत आकडेवारी संकलित करून लक्षात ठेवण्यासाठी देखील विशेष प्रयत्नांची गरज आहे . दोनशे प्रश्ना पैकी पन्नास प्रश्ना ह्या घटकासाठी असल्याने हा घटक खुप महत्वाचा आहे.हा चाचणी घटक चांगली तयारी केल्यास स्कोरिंग साठी सुद्धा महत्वाचा आहे. ह्या घटकामध्ये सर्व सामान्य विद्यार्थी हि भरपूर सरावाच्या आधारे ५० पैकी ४७ पेक्षाही अधिक गुण मिळवू शकतो.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|